शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

३६१ विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST

नागपूर : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला ...

नागपूर : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात ३६१ विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना दरमहा ३०० रुपयांप्रमाणे फेब्रुवारी व मार्च अशा दोन महिन्यांचा भत्ता त्यांच्या आईच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

सक्तीचा शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत कलम ६ (३) (१) नुसार नजीकच्या शाळांच्या क्षेत्रामध्ये किंवा हद्दीच्या आत शाळा उपलब्ध नाहीत अशा वस्तींमधील ६ ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी मोफत परिवहन सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. जेथे एसटीची सुविधा नाही तेथे केंद्र शासनाकडून वाहतुकीकरिता प्रती विद्यार्थी दर महिन्याला ३०० रुपये, असे १० महिन्यांसाठी तीन हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात येते. यावर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना १० महिन्यांऐवजी केवळ दोन महिन्यांचा वाहतूक भत्ता मिळणार आहे. जिल्ह्यातील ३६१ विद्यार्थी त्यासाठी पात्र ठरले आहेत.

- कोरोनाचा बसला फटका

यावर्षी कोरोनामुळे शाळा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यामुळे पूर्ण शैक्षणिक वर्षात हे वर्ग दोन महिने सुरू राहिले. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्गच यावर्षी झाले नाहीत. त्यामुळे शासनाने ५ ते ८ च्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवासभत्ता दिला आहे.

- दृष्टिक्षेपात

शहरी भागात एकही विद्यार्थी वाहतूक भत्त्यासाठी पात्र ठरला नाही. ग्रामीण भागातील ३६१ विद्यार्थी पात्र ठरले. त्यांना दरमहा ३०० रुपये असे दोन महिन्यांकरिता ६०० रुपयांप्रमाणे २,१६,६६० रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.

- भत्त्याचा निधी वितरणाची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल

शासनाने २७ जानेवारी २०२१ रोजी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील ३६१ विद्यार्थी वाहतूक भत्त्यासाठी पात्र ठरले. शासनाच्या निर्देशानुसार लवकरच विद्यार्थ्यांच्या आईच्या खात्यात निधी वितरित करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.