शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

तीन वर्षांत ३६ जणांचा जीव गेला, ४७ गंभीर जखमी तरीही....

By जितेंद्र ढवळे | Updated: November 29, 2023 17:57 IST

काटोल-सावरगाव मार्गाचे रुंदीकरण कधी?

नागपूर : अरुंद असलेला काटोल-सावरगाव मार्ग सध्या अपघात मार्ग झाला आहे. या मार्गावर दिवसाआड लहान-मोठे अपघात होत असतात. गत तीन वर्षात या मार्गावर झालेल्या विविध अपघातात ३६ जणांचा जीव गेला तर ४७ जण गंभीर जखमी झाले आहेत. तरीही या मार्गाचे रुंदीकरण कधी होणार, याबाबत लोकप्रतिनिधी वा अधिकारी यांनी मौन बाळगले आहे. काटोल-सावरगाव वडचिचोली मार्गे मध्य प्रदेशला जोडला जाणार राज्य मार्ग आहे. या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.

काटोल शहरातून जाणाऱ्या या मार्गावर जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कोंढाळी राष्ट्रीय मार्गावरून मध्य प्रदेशला जाण्याकरिता हा मार्ग सोईचा ठरतो. या मार्गावरून मध्य प्रदेश, सावनेर आदी भागांतून रेतीचे टिप्पर रात्रन् दिवस धावतात. अशात या मार्गावर काटोल-सावरगाव-नरखेड यामध्ये येणाऱ्या अनेक गावांच्या दुचाकी-चारचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते.

गत तीन वर्षात या मार्गावर झालेल्या अपघातांपैकी ८० टक्के अपघातांचे कारण मार्गाची कमी रुंदी असल्याचे आढळून आले आहे. अनेकदा मोठी गाडी आली की दुसऱ्या बाजूने येणारी गाडी ही सरळ खाली जाते. त्यामुळे गाडी चालकाचा तोल जाऊन अपघात झाले आहेत. काहींना ओव्हरटेक करताना पुढे जागाच मिळाली नसल्याने अपघात झाले आहेत.

काटोल-सावरगाव मार्गावर येनवा, डोंगरगाव, मेंडकी, मसली सोनोली आणि अनेक गावांतील शेकडो नागरिक नियमित काटोल शहरात रोजगार व इतर कामांसाठी येतात. या मार्गावर गत पाच वर्षांत वर्दळ वाढली आहे. या मार्गाचे तातडीने रुंदीकरण होणे गरजेचे आहे.

- सागर भैस्वार, रा. मेंडकी

पूर्वी या मार्गावर मोजक्याच वाहनांची वर्दळ असायची. आज यात मोठी वाढ झाली आहे. काटोल-डोंगरगावपर्यंत तर आता लोकवस्ती वाढली आहे. मी डोंगरगाव येथील कंपनीत नोकरीला जातो. अशात नियमित अपघात झाल्याचे दिसून येतात. त्यामुळे कमीत कमी डोंगरगावपर्यंत तरी या मार्गाचे रुंदीकरण आवश्यक आहे.

- संदीप बरडे, खंते ले-आऊट, काटो

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर