शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

तीन वर्षांत ३६ जणांचा जीव गेला, ४७ गंभीर जखमी तरीही....

By जितेंद्र ढवळे | Updated: November 29, 2023 17:57 IST

काटोल-सावरगाव मार्गाचे रुंदीकरण कधी?

नागपूर : अरुंद असलेला काटोल-सावरगाव मार्ग सध्या अपघात मार्ग झाला आहे. या मार्गावर दिवसाआड लहान-मोठे अपघात होत असतात. गत तीन वर्षात या मार्गावर झालेल्या विविध अपघातात ३६ जणांचा जीव गेला तर ४७ जण गंभीर जखमी झाले आहेत. तरीही या मार्गाचे रुंदीकरण कधी होणार, याबाबत लोकप्रतिनिधी वा अधिकारी यांनी मौन बाळगले आहे. काटोल-सावरगाव वडचिचोली मार्गे मध्य प्रदेशला जोडला जाणार राज्य मार्ग आहे. या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.

काटोल शहरातून जाणाऱ्या या मार्गावर जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कोंढाळी राष्ट्रीय मार्गावरून मध्य प्रदेशला जाण्याकरिता हा मार्ग सोईचा ठरतो. या मार्गावरून मध्य प्रदेश, सावनेर आदी भागांतून रेतीचे टिप्पर रात्रन् दिवस धावतात. अशात या मार्गावर काटोल-सावरगाव-नरखेड यामध्ये येणाऱ्या अनेक गावांच्या दुचाकी-चारचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते.

गत तीन वर्षात या मार्गावर झालेल्या अपघातांपैकी ८० टक्के अपघातांचे कारण मार्गाची कमी रुंदी असल्याचे आढळून आले आहे. अनेकदा मोठी गाडी आली की दुसऱ्या बाजूने येणारी गाडी ही सरळ खाली जाते. त्यामुळे गाडी चालकाचा तोल जाऊन अपघात झाले आहेत. काहींना ओव्हरटेक करताना पुढे जागाच मिळाली नसल्याने अपघात झाले आहेत.

काटोल-सावरगाव मार्गावर येनवा, डोंगरगाव, मेंडकी, मसली सोनोली आणि अनेक गावांतील शेकडो नागरिक नियमित काटोल शहरात रोजगार व इतर कामांसाठी येतात. या मार्गावर गत पाच वर्षांत वर्दळ वाढली आहे. या मार्गाचे तातडीने रुंदीकरण होणे गरजेचे आहे.

- सागर भैस्वार, रा. मेंडकी

पूर्वी या मार्गावर मोजक्याच वाहनांची वर्दळ असायची. आज यात मोठी वाढ झाली आहे. काटोल-डोंगरगावपर्यंत तर आता लोकवस्ती वाढली आहे. मी डोंगरगाव येथील कंपनीत नोकरीला जातो. अशात नियमित अपघात झाल्याचे दिसून येतात. त्यामुळे कमीत कमी डोंगरगावपर्यंत तरी या मार्गाचे रुंदीकरण आवश्यक आहे.

- संदीप बरडे, खंते ले-आऊट, काटो

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर