शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नागपुरात ३५० विद्युत कर्मचारी सामूहिक सुटीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 20:34 IST

Agitation, mahavitaran, employee, Nagpur news आपल्या घर-प्रतिष्ठानातील विद्युत वाहिनीत तांत्रिक अडचणीमुळे वीज बाधित झाली तर तो पुरवठा नियमित होण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. महावितरणमध्ये आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून काम करत असलेले ३५० कर्मचारी शुक्रवारी दुपारी ४ वाजतापासून सामूहिक सुटीवर गेल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देतांत्रिक अडचणीच्या क्षणी वीजपुरवठा कठीणएसएनडीएलमधून आलेल्या कर्मचाऱ्यांना हटवल्याची नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या घर-प्रतिष्ठानातील विद्युत वाहिनीत तांत्रिक अडचणीमुळे वीज बाधित झाली तर तो पुरवठा नियमित होण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. महावितरणमध्ये आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून काम करत असलेले ३५० कर्मचारी शुक्रवारी दुपारी ४ वाजतापासून सामूहिक सुटीवर गेल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व कर्मचारी एसएनडीएलमधून महावितरणमध्ये आले आहेत. यातील ४० कर्मचाऱ्यांना काढल्याने इतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक सुटीचे अस्त्र उपसले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांअभावी तांत्रिक अडचण उद्भवल्यास विजेचा पुरवठा नियमित करण्यास महावितरणला अतिशय कठीण जाणार आहे.गेल्याच वर्षी सप्टेंबरमध्ये एसएनडीएलकडून महावितरणने शहरातील महाल, गांधीबाग व सिव्हिल लाईन्स या विभागाचे कामकाज आपल्या हाती घेतले होते. मात्र, एसएनडीएलचे आॅपरेटर्स व लाईनमन्सला आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कायम ठेवण्यात आले होते. आता त्यांच्या जागी एक-एक करत महावितरणच्या स्थायी कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जात आहे. याच धोरणामुळे आतापर्यंत एसएनडीएलचे जवळपास ४० आॅपरेटर्स व लाईनमन्स काढण्यात आले आहेत. महावितरणच्या याच धोरणाचा निषेध एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी काढला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या बॅनरखाली सर्व कर्मचाºयांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून शुक्रवारी दुपारी ४ वाजतापासून सामूहिक रजेवर जात असल्याची माहिती दिली. झोन सचिव नितीन शेंदरे यांना सादर केलेल्या पत्राच्या अनुषंगाने शहरातील वीज संकट दूर करण्यासाठी या कर्मचाºयांना महावितरणमध्ये समाविष्ट करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना काढून महावितरणने या कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी राज्याचे ऊर्जामंत्री व मुख्य अभियंत्यांना अनेक पत्र लिहिले आहेत. मात्र, त्याकडे सारासार दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी लावला आहे. हे कर्मचारी बऱ्याच वर्षांपासून शहरातील सबस्टेशन्ससोबतच वितरण प्रणाली सांभाळत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने आॅपरेटर्स व लाईनमन एकसाथ रजेवर गेल्याने वीज वितरण प्रणाली धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.समस्या निर्माण होणार नाही - महावितरणकंपनी नागरिकांना कोणतीच समस्या निर्माण होऊ देणार नाही, असे वक्तव्य महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले. फिल्डवर कंपनीचे २०० ऑपरेटर्स, लाईनमन तैनात असून, अन्य कर्मचारीही त्यांना सहकार्य करतील. अशा स्थितीत मानवबळाची कोणतीच समस्या उत्पन्न होणार नसल्याचे दोडके यांनी म्हटले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी