शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपुरात ३५० विद्युत कर्मचारी सामूहिक सुटीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 20:34 IST

Agitation, mahavitaran, employee, Nagpur news आपल्या घर-प्रतिष्ठानातील विद्युत वाहिनीत तांत्रिक अडचणीमुळे वीज बाधित झाली तर तो पुरवठा नियमित होण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. महावितरणमध्ये आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून काम करत असलेले ३५० कर्मचारी शुक्रवारी दुपारी ४ वाजतापासून सामूहिक सुटीवर गेल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देतांत्रिक अडचणीच्या क्षणी वीजपुरवठा कठीणएसएनडीएलमधून आलेल्या कर्मचाऱ्यांना हटवल्याची नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या घर-प्रतिष्ठानातील विद्युत वाहिनीत तांत्रिक अडचणीमुळे वीज बाधित झाली तर तो पुरवठा नियमित होण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. महावितरणमध्ये आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून काम करत असलेले ३५० कर्मचारी शुक्रवारी दुपारी ४ वाजतापासून सामूहिक सुटीवर गेल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व कर्मचारी एसएनडीएलमधून महावितरणमध्ये आले आहेत. यातील ४० कर्मचाऱ्यांना काढल्याने इतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक सुटीचे अस्त्र उपसले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांअभावी तांत्रिक अडचण उद्भवल्यास विजेचा पुरवठा नियमित करण्यास महावितरणला अतिशय कठीण जाणार आहे.गेल्याच वर्षी सप्टेंबरमध्ये एसएनडीएलकडून महावितरणने शहरातील महाल, गांधीबाग व सिव्हिल लाईन्स या विभागाचे कामकाज आपल्या हाती घेतले होते. मात्र, एसएनडीएलचे आॅपरेटर्स व लाईनमन्सला आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कायम ठेवण्यात आले होते. आता त्यांच्या जागी एक-एक करत महावितरणच्या स्थायी कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जात आहे. याच धोरणामुळे आतापर्यंत एसएनडीएलचे जवळपास ४० आॅपरेटर्स व लाईनमन्स काढण्यात आले आहेत. महावितरणच्या याच धोरणाचा निषेध एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी काढला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या बॅनरखाली सर्व कर्मचाºयांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून शुक्रवारी दुपारी ४ वाजतापासून सामूहिक रजेवर जात असल्याची माहिती दिली. झोन सचिव नितीन शेंदरे यांना सादर केलेल्या पत्राच्या अनुषंगाने शहरातील वीज संकट दूर करण्यासाठी या कर्मचाºयांना महावितरणमध्ये समाविष्ट करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना काढून महावितरणने या कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी राज्याचे ऊर्जामंत्री व मुख्य अभियंत्यांना अनेक पत्र लिहिले आहेत. मात्र, त्याकडे सारासार दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी लावला आहे. हे कर्मचारी बऱ्याच वर्षांपासून शहरातील सबस्टेशन्ससोबतच वितरण प्रणाली सांभाळत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने आॅपरेटर्स व लाईनमन एकसाथ रजेवर गेल्याने वीज वितरण प्रणाली धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.समस्या निर्माण होणार नाही - महावितरणकंपनी नागरिकांना कोणतीच समस्या निर्माण होऊ देणार नाही, असे वक्तव्य महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले. फिल्डवर कंपनीचे २०० ऑपरेटर्स, लाईनमन तैनात असून, अन्य कर्मचारीही त्यांना सहकार्य करतील. अशा स्थितीत मानवबळाची कोणतीच समस्या उत्पन्न होणार नसल्याचे दोडके यांनी म्हटले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी