शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नागपूर विभागात सहा महिन्यांत वीज कोसळून ३२ जणांचा मृत्यू;  ७० जनावरेही ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 21:32 IST

Nagpur News नागपूर विभागात मागील सहा महिन्यांत वीज कोसळून तब्बल ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक १० जणांचा मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाला आहे.

नागपूर : नागपूर विभागात मागील सहा महिन्यांत वीज कोसळून तब्बल ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक १० जणांचा मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाला आहे. इतकेच नव्हे, तर विभागात ७० जनावरेही वीज पडून मृत्युमुखी पडली आहेत.

पावसाळ्यात वीज पडून मृत्युमुखी पडण्याचे प्रकार घडत असतात. नागपूर विभागाचाच विचार केला, तर या वर्षी आतापर्यंत ३२ व्यक्ती मृत्युमुखी पडलेले आहेत. यात जिल्हानिहाय विचार केला असता, नागपूर १०, चंद्रपूर ७, गोंदिया ७, भंडारा ४, वर्धा २ आणि गडचिरोली जिल्ह्यात २ जण वीज पडून मृत्युमुखी पडले. यात जनावरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. सहा महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात २० जनावरांचा मृत्यू झाला. त्यानंतर, नागपूर जिल्ह्यात १५, वर्धा १२, भंडारा ११, गोंदिया ८ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ४ जनावरांचा मृत्यू झाला.

- नागपूर जिल्ह्यात चार वर्षांत ७२ मृत्यू

नागपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे ७२ जणांचा मृत्यू झाला. यात वीज पडून ५९ जणांचा मृत्यू, पुरात वाहून ९ जणांचा, झाड पडून २ व भिंत पडून २ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Deathमृत्यू