शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गांधीसागरच्या सौंदर्यीकरणासाठी ३१.१५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 21:11 IST

गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीच्या ३१.१५ कोटींच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. प्रकल्पाच्या निविदा काढण्याचे कार्यादेश देण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रकल्पाला शासनाची मंजुरी : भाऊजी पागे उद्यानाची पुनर्बांधणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीच्या ३१.१५ कोटींच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. प्रकल्पाच्या निविदा काढण्याचे कार्यादेश देण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.मागील काही वर्षांपासून गांधीसागर तलाव सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीबाबतचा प्रस्ताव २९ ऑक्टोबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला १२ कोटींच्या मर्यादेत तांत्रिक मान्यतेसह हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या अधीन प्रस्तावास तत्त्वत: मान्यता प्रदान केली आहे. त्याअनुषंगाने सुधारित प्रस्ताव ११ फेब्रुवारी २०१९ रोजी शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार आता हा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्याला मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यातील खर्च १४.१० कोटी आहे. १२ कोटींच्या वरील भार हा महापालिकेला उचलावयाचा आहे. दुसऱ्या टप्प्यात १६.२५ कोटी खर्च होणार आहे. प्रकल्पावर ध्रुव कन्सल्टंट यांनी सुरुवातीपासून काम केले असल्यामुळे प्रकल्पाचे आराखडे तयार करणे, अहवाल तयार करणे, प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव बनवून सादर करणे तसेच सविस्तर अंदाजपत्रक तयार करणे इत्यादी कामे त्यांनी केली असून, त्यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. यासाठी कन्सल्टंटला प्रकल्पाच्या २ टक्के रक्कम दिली जाणार आहे. शासनाच्या विशेष निधीतून गांधीसागर तलावाच्या मध्यभागी असलेल्या भाऊजी पागे उद्यानाची पुनर्बांधणी, तलावाच्या पडलेल्या भिंती बांधणे व उर्वरित भिंतीचे सशक्तीकरण आदी कामांचा यात समावेश आहे.खाऊगल्ली सुरू होण्याची आशाखाद्यपदार्थ विक्रेत्यांना गांधीसागर तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत खाऊगल्ली निर्माण करण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी स्थायी समितीने घेतला होता. त्यानुसार येथे ३२ डोम उभारण्यात आले आहेत. परंतु बांधल्यापासून ते वापराविना पडून आहेत. बाजूच्या रस्त्यांचे सिमेंटीकरण सुरू असल्याने सध्या खाऊगल्लीचा रहदारीसाठी वापर सुरू आहे. या प्रकल्पावर ८० लाखांचा खर्च करण्यात आला आहे. तलाव सौंदर्यीकणामुळे खाऊ गल्लीला चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :Gandhisagar Lakeगांधीसागर तलावfundsनिधी