शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे... वीज ग्राहकांच्या दर महिन्याला ३.११ लाख तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 10:47 IST

वीजपुरवठा वारंवार खंडित होणे, वीजबिलावरून वाढतोय संताप : मुख्य अभियंत्यांना तक्रारी निवारण्याचे निर्देश

कमल शर्मा

नागपूर : राज्यात वीज वितरण यंत्रणेची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. दर महिन्याला महावितरणलाग्राहकांच्या ३.११ लाख तक्रारी येत आहेत. त्याचबरोबर ३.५६ लाख लोकांनी कॉल सेंटरला फोन करून मदत मागितली आहे.

महावितरणकडे येत असलेल्या बहुतांश तक्रारी वीजपुरवठा खंडित होणे व वीजबिलाच्या संदर्भातील आहेत. टॅरिफ बदलणे, नावात बदल, डुप्लिकेट बिल आदी बाबतीत तक्रारी आहेत. २०२१-२२ मध्ये कंपनीकडे टोल फ्री क्रमांकावरून २.३१ लाख तक्रारी आल्या होत्या. २२-२३ मध्ये त्यात घट होऊन १.८२ लाख झाली होती. परंतु या वर्षात मेपर्यंत दर महिन्याला सरासरी ३.५६ लाख तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारी निवारण वेळेवर होत नसल्याने लोकांमध्ये रोष निर्माण होत आहे. महावितरणचे अध्यक्ष, सहव्यवस्थापकीय निदेशक लोकेश चंद्र यांनी ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी गंभीरतेने घेतल्या आहेत. त्यांनी राज्यातील सर्व मुख्य अभियंत्यांना तक्रारीकडे वैयक्तिक लक्ष देण्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, ग्राहकांच्या सेवेला प्राथमिकता देणे गरजेचे आहे.

- ग्राहकांना माहितीही दिली जात नाही

मेंटनन्ससाठी वीजपुरवठा बंद ठेवणे अथवा वीजबिलासंदर्भात आवश्यक माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. २०२१-२२ मध्ये महावितरणने १०.२१ लाख ग्राहकांना फोन केले होते. पण २०२२-२३ मध्ये केवळ ५.३२ लाख ग्राहकांनाच फोनवर माहिती देण्यात आली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये हा आकडा एक लाखावर आला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजconsumerग्राहक