शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

पेंच प्रकल्पासाठी ३०० कोटी

By admin | Updated: March 2, 2016 03:11 IST

पेंच प्रकल्प व कन्हान बॅरेज कोच्छी प्रकल्प हे नागपूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे प्रकल्प आहेत.

मंत्रिमंडळाचा निर्णय : पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार नागपूर : पेंच प्रकल्प व कन्हान बॅरेज कोच्छी प्रकल्प हे नागपूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे प्रकल्प आहेत. नागपूर शहराचा होत असलेला विकास व भविष्यातील शहराची पाण्याची गरज विचारात घेता पेंच प्रकल्पासाठी तीन वर्षात ३०० कोटींची तरतूद करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पेंच प्रकल्प व कन्हान बॅरेज कोच्छी प्रकल्पाकडे मंत्रिमंडळाचे लक्ष वेधले होते.शहर व जिल्ह्याचा विकास होत आहे. नवीन मोठमोठे प्रकल्प उभे राहात आहेत. या सोबतच शहराची लोकसंख्या वाढत असल्याने भविष्यात पिण्याचे पाणी, औद्योगिक क्षेत्र व शेतीसाठी पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.पेंच प्रकल्पासाठी ३०० कोटी तर कोच्छी प्रकल्पासाठी १७० कोटींचा निधी मिळणार असल्याने या प्रकल्पातील विविध प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण होतील. बॅरेजच्या उजव्या बाजूकडील उर्ध्व आणि निम्न भागातील गार्डवाल, डिवाइड वाल आणि किवाल याचे काम पूर्ण झाले आहे. बॅरेजच्या १६ ब्लागपैकी ६ ब्लॉगचे ८० टक्के काम करण्यात आले आहे उभ्या पद्धतीच्या १६ दरवाजाचे फेब्रिकेशनचे काम पूर्ण झाले आहे. बॅरेजचे पुढील काम मार्गी लागण्यासाठी निधीची गरज होती. यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे शहर व जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यात वाढ होईल. तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्याला मदत होणार आहे. (प्रतिनिधी)कोच्छी प्रकल्पासाठी १७० कोटी सावनेर तालुक्यातील कन्हान नदीवर बॅरेज कोच्छी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे सावनेर तालुक्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहीत करण्यासाठी १७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे सावनेर तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कन्हान नदी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येताना या नदीवर कोणत्याही स्वरुपाचा बंधारा नाही. त्यामुळे कोच्छी प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा होणार आहे. शहर व जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सुटेलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेंच प्रकल्पासाठी ३०० कोटी तर कोच्छी प्रकल्पासाठी १७० कोटी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहर व जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटेल. भविष्यातही पाण्याची अडचण जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तसेच शहरात उभ्या राहात असलेल्या मोठ्या प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या बाबत शहरातील जनतेच्यावतीने त्यांचे स्वागत करतो.प्रवीण दटके, महापौर