शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

उपराजधानीत कोरोनाच्या अहवालास ३० तासांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 21:27 IST

नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढताच शासकीय प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल मिळण्यास २४ ते ३० तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

ठळक मुद्देखासगीमध्ये ४७ तासानंतर मिळतो अहवालजोखमीच्या गटातील रुग्णांची प्रकृती होत आहे गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी व मृतांची संख्या कमी करण्यासाठ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची व लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने तपासणी करून उपचाराखाली आणण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढताच शासकीय प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल मिळण्यास २४ ते ३० तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे तर खासगीमध्ये ४८ तासावर वेळ लागत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी जोखमीच्या गटातील रुग्णांची प्रकृती गंभीर होत आहे.प्रत्येक संशयिताची चाचणी आवश्यक आहे. तसे झाले नाही तर ते इतर लोकांमध्ये राहून कोरोना पसरवत राहतील. यामुळे चाचणी खूप महत्त्वाची आहे. नागपुरात मेयो, मेडिकल, एम्स, नीरी, माफसू व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असे मिळून सहा शासकीय प्रयोगशाळेत कोविडची आरटीपीसीआर तपासणी होते. हीच चाचणी करणाऱ्या सुमारे पाचवर खासगी प्रयोगशाळाही आहेत. मेडिकल व मेयोच्या प्रयोगशाळेत रोजचे नमुने तपासण्याची क्षमता प्रत्येकी ७००वर आहे. एम्सची क्षमता ३९०, माफसू, नीरी व विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची क्षमता प्रत्येकी १२५ तर खासगी प्रयोगशाळेची साधारण एवढीच क्षमता आहे. खासगी व शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेतील रोजची क्षमता तीन हजाराच्या घरात असताना त्याच्यावर नमुने येत आहे. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ८४३४ चाचण्या झाल्या. यात ५०४५ रॅपिड अ­ॅन्टिजन चाचण्या तर ३३८९ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. परिणामी, प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढत आहे.-खासगीमध्ये दोन दिवसाआड अहवालनागपूर जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्या काही खासगी प्रयोगशाळेचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवितात. त्याचा अहवाल येण्यास ४८ तासांचा कालावधी लागत आहे. काही खासगी प्रयोगशाळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण तपासणीसाठी येत असल्याने त्यांनाही एवढाच उशीर होत आहे, परिणामी काही ठिकाणी दोन दिवसाचा कालावधी लागत आहे.-तपासणी क्षमता वाढविण्याची गरजमेयो, मेडिकल व एम्सच्या प्रयोगशाळेवर स्वत:च्या रुग्णालयातील रुग्णांसोबतच ग्रामीण, महानगरपालिका व इतर जिल्ह्यातून येणाºया नमुन्यांचीही भार आहे. यामुळे माफसू, नीरी व विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.-आरटीपीसीआर चाचणीसाठी कठोर धोरण हवेरॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी जागोजागी होत आहे. ज्यांना लक्षणे नाहीत किंवा संपर्कात आलेले नाही तेही भीती पोटी तपासणी करीत आहे. यात निगेटिव्ह आल्यास थेट आरटीपीसीआर करीत आहे. परिणामी, या चाचण्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. रिपीट चाचणीचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे या चाचणीसाठी कठोर धोरण आखणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस