शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

हवामान विभागाचे २७ आदिवासी कर्मचाऱ्यांची बडतर्फी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:08 IST

जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून बडतर्फ करण्यात आलेल्या नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागातील २७ आदिवासी कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मोठा दिलासा मिळाला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी विविध बाबी लक्षात घेता बडतर्फीचा वादग्रस्त निर्णय रद्द करून कर्मचाऱ्यांना सत्काळ सेवेत परत घेण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : तात्काळ सेवेत परत घेण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क    नागपूर : जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून बडतर्फ करण्यात आलेल्या नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागातील २७ आदिवासी कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मोठा दिलासा मिळाला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी विविध बाबी लक्षात घेता बडतर्फीचा वादग्रस्त निर्णय रद्द करून कर्मचाऱ्यांना सत्काळ सेवेत परत घेण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला.वादग्रस्त निर्णयाविरुद्ध विनायक नंदनवार व इतर २६ कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केली होती. केंद्र सरकारने या कर्मचाऱ्यांची सर्व कागदपत्रे ८ दिवसांत परत करावीत, त्यानंतर ७ दिवसांत कर्मचाऱ्यांनी जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी दावा दाखल करावा व त्यानंतर ६ महिन्यामध्ये समितीने कर्मचाऱ्यांच्या दाव्यांवर निर्णय द्यावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बडतर्फीच्या काळातील वेतनाचा मुद्दा पडताळणी समितीच्या निर्णयाधीन ठेवण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांकडे हलबा-अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र असून ते ३० वर्षांपासून हवामान विभागाच्या सेवेत आहेत. हवामान विभागाने २०१४ मध्ये जातीशी संबंधित कागदपत्रे तपासली असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील अनिल मार्डीकर, अ‍ॅड. तुषार मंडलेकर व अ‍ॅड. रोहण मालविया यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयEmployeeकर्मचारी