शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

केरळच्या पूरग्रस्तांसाठी सरसावले रेल्वेचे २६ हजार कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 23:24 IST

केरळच्या पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. अशा बिकट परिस्थितीत आपली सामाजिक जबाबदारी ओळखून रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन पंतप्रधान मदत निधीत गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी आठ दिवसात गोळा झालेले लाखो रुपये पंतप्रधान मदत निधीत जमा करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देएक दिवसाचे वेतन देणार : आठ दिवसात गोळा करणार रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केरळच्या पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. अशा बिकट परिस्थितीत आपली सामाजिक जबाबदारी ओळखून रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन पंतप्रधान मदत निधीत गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी आठ दिवसात गोळा झालेले लाखो रुपये पंतप्रधान मदत निधीत जमा करण्यात येणार आहेत.केरळच्या पूरग्रस्तांसाठी देशभरातून खाद्यसामुग्रीसह इतर वस्तू रवाना करण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने ही सामुग्री पाठविणाºया संस्थांकडून एक रुपयाही न घेता सामुग्री पाठविण्याची घोषणा केली आहे. एवढ्यावरच रेल्वेचे कर्मचारी थांबले नाहीत, तर पूरग्रस्तांसाठी काहीतरी ठोस मदत करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कर्मचारी सरसावले आहेत. त्यांनी आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर, वर्धा, धामणगाव, पुलगाव, काटोल, नरखेड, पांढुर्णा, बैतुल, वरोरा, हिंगणघाट, अजनी मिळून एकूण १५ हजार कर्मचारी आहेत. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मोतीबाग, इतवारी, गोंदिया, भंडारा, डोंगरगड, राजनांदगाव, छिंदवाडा, नैनपूरसह लहानमोठे असे ७६ स्टेशन आहेत. येथील ११५०० कर्मचारी आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी देणार आहेत. गँगमनपासून तर अधिकाºयांपर्यंत सर्वच जण आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान मदत निधीत रक्कम जमा करणार आहेत. आगामी २६ तारखेपर्यंत मदतनिधी गोळा करून आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत गोळा झालेली रक्कम पंतप्रधान मदतनिधीत जमा करण्यात येणार आहे. रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाºयांनी पूरग्रस्तांसाठी एक दिवसांचे वेतन देण्याचा निर्णय घेऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडून देशप्रेमाची भावना दाखवून दिली आहे.महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करणार रक्कम‘रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केरळच्या पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. २६ आॅगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून रक्कम कपात करून गोळा करण्यात येईल. गोळा झालेली रक्कम आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पंतप्रधान मदतनिधीत जमा करण्यात येणार आहे.’-ए. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग.

टॅग्स :railwayरेल्वेKerala Floodsकेरळ पूर