शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

केरळच्या पूरग्रस्तांसाठी सरसावले रेल्वेचे २६ हजार कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 23:24 IST

केरळच्या पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. अशा बिकट परिस्थितीत आपली सामाजिक जबाबदारी ओळखून रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन पंतप्रधान मदत निधीत गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी आठ दिवसात गोळा झालेले लाखो रुपये पंतप्रधान मदत निधीत जमा करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देएक दिवसाचे वेतन देणार : आठ दिवसात गोळा करणार रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केरळच्या पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. अशा बिकट परिस्थितीत आपली सामाजिक जबाबदारी ओळखून रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन पंतप्रधान मदत निधीत गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी आठ दिवसात गोळा झालेले लाखो रुपये पंतप्रधान मदत निधीत जमा करण्यात येणार आहेत.केरळच्या पूरग्रस्तांसाठी देशभरातून खाद्यसामुग्रीसह इतर वस्तू रवाना करण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने ही सामुग्री पाठविणाºया संस्थांकडून एक रुपयाही न घेता सामुग्री पाठविण्याची घोषणा केली आहे. एवढ्यावरच रेल्वेचे कर्मचारी थांबले नाहीत, तर पूरग्रस्तांसाठी काहीतरी ठोस मदत करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कर्मचारी सरसावले आहेत. त्यांनी आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर, वर्धा, धामणगाव, पुलगाव, काटोल, नरखेड, पांढुर्णा, बैतुल, वरोरा, हिंगणघाट, अजनी मिळून एकूण १५ हजार कर्मचारी आहेत. तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मोतीबाग, इतवारी, गोंदिया, भंडारा, डोंगरगड, राजनांदगाव, छिंदवाडा, नैनपूरसह लहानमोठे असे ७६ स्टेशन आहेत. येथील ११५०० कर्मचारी आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी देणार आहेत. गँगमनपासून तर अधिकाºयांपर्यंत सर्वच जण आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान मदत निधीत रक्कम जमा करणार आहेत. आगामी २६ तारखेपर्यंत मदतनिधी गोळा करून आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत गोळा झालेली रक्कम पंतप्रधान मदतनिधीत जमा करण्यात येणार आहे. रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाºयांनी पूरग्रस्तांसाठी एक दिवसांचे वेतन देण्याचा निर्णय घेऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडून देशप्रेमाची भावना दाखवून दिली आहे.महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करणार रक्कम‘रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केरळच्या पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. २६ आॅगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून रक्कम कपात करून गोळा करण्यात येईल. गोळा झालेली रक्कम आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पंतप्रधान मदतनिधीत जमा करण्यात येणार आहे.’-ए. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग.

टॅग्स :railwayरेल्वेKerala Floodsकेरळ पूर