शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘रॅबिज’मुळे वर्षाला २५ हजार मृत्यू

By admin | Updated: September 30, 2014 00:39 IST

भारतात ‘रॅबिज’मुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील ‘रॅबिज’च्या तुलनेत देशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. शहरात जानेवारी ते आॅगस्ट २०१४ पर्यंत सुमारे २२०० लोकांना

शहरात २२०० जणांना श्वानदंश : १५ वर्षांखालील मुलांची संख्या सर्वाधिकनागपूर : भारतात ‘रॅबिज’मुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील ‘रॅबिज’च्या तुलनेत देशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. शहरात जानेवारी ते आॅगस्ट २०१४ पर्यंत सुमारे २२०० लोकांना श्वानदंश केला आहे. यात १५ वर्षांखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. उपराजधानीत गल्लीबोळापासून ते रस्त्यावर मोठ्या संख्येत कुत्री दिसून येतात. ही संख्या साडेतीन लाखांच्या आसपास असल्याचा अंदाज खुद्द महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आहे. यातील मोकाट कुत्री आठ ते दहा जणांना दररोज चावतात. जानेवारी २०१३ ते नोव्हेंबर २०१३ पर्यंत ५ हजार ३३० लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मागील आठ महिन्यात दोन हजार २०० लोकांना श्वान दंश झाला आहे. ही आकडेवारी महापालिकेसह शासकीय रुग्णालयांमधील आहे. परंतु याच्या दुप्पट लोक खासगी इस्पितळात जात असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.पश्चिम आणि पूर्वमध्ये सर्वात जास्त श्वानदंशउपराजधानीत सर्वात जास्त कुत्र्यांनी चावा पश्चिम व पूर्व नागपुरातील लोकांना घेतला आहे. मागील वर्षी पश्चिम व पूर्व नागपुरात आठ हजार लोकांना श्वानदंश झाला आहे. उत्तर नागपुरात एक हजार लोकांना, मध्य नागपुरात ६०० तर दक्षिण नागपुरात ५०० जणांना चावा घेतला आहे. कुत्र्यांच्या झुंडीकडे दुर्लक्षचशहरातील रस्त्यावर रात्री कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसून येतात. रात्रपाळी करून घरी परतणाऱ्या नागरिकांच्या अंगावर हीच मोकाट कुत्री धावून जातात. जाटतरोडी चौक ते मेडिकल चौक मार्ग, लोखंडी पूल ते शनिमंदिर, मानेवाडा रिंग रोड, उंटखाना चौक ते अशोक चौक, प्रतापनगर सिमेंट रोड ते गोपालनगर, काचीपुरा रामदासपेठ मार्ग, अभ्यंकरनगर रोड, सुगतनगर मार्ग, लष्करीबाग चौक ते वैशालीनगर चौक यासह जिथे-जिथे उघड्यावर मासविक्री होते तिथे-तिथे या झुंडी दिसून येतात. परंतु याकडे अद्यापही महापालिकेचे लक्ष नसल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)नसबंदी मोहिमेनंतरही कुत्र्यांची पिलावळवाढत्या श्वानदंशाला घेऊन २००६ मध्ये महानगरपालिकेने कुत्र्यांची नसबंदी मोहीम चालविली. परंतु २०११ मध्ये या मोहिमेवर आक्षेप घेतल्याने थंडबस्त्यात पडली. तब्बल तीन वर्षानंतर जुलै २०१४ पासून ही मोहीम पुन्हा सुरू झाली. कोल्हापूरच्या सोसायटी फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेला हे काम देण्यात आले आहे. एका कुत्र्याच्या नसबंदीवर महापालिकेचा ५२९ रुपये खर्च होत आहे. या संस्थेने जुलै महिन्यात २५८ तर आॅगस्ट महिन्यात ५३५ कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया केली. असे असताना गल्ली-बोळात आजही कुत्र्यांची पिलावळ दिसून येत आहे.