शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘रॅबिज’मुळे वर्षाला २५ हजार मृत्यू

By admin | Updated: September 30, 2014 00:39 IST

भारतात ‘रॅबिज’मुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील ‘रॅबिज’च्या तुलनेत देशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. शहरात जानेवारी ते आॅगस्ट २०१४ पर्यंत सुमारे २२०० लोकांना

शहरात २२०० जणांना श्वानदंश : १५ वर्षांखालील मुलांची संख्या सर्वाधिकनागपूर : भारतात ‘रॅबिज’मुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील ‘रॅबिज’च्या तुलनेत देशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. शहरात जानेवारी ते आॅगस्ट २०१४ पर्यंत सुमारे २२०० लोकांना श्वानदंश केला आहे. यात १५ वर्षांखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. उपराजधानीत गल्लीबोळापासून ते रस्त्यावर मोठ्या संख्येत कुत्री दिसून येतात. ही संख्या साडेतीन लाखांच्या आसपास असल्याचा अंदाज खुद्द महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आहे. यातील मोकाट कुत्री आठ ते दहा जणांना दररोज चावतात. जानेवारी २०१३ ते नोव्हेंबर २०१३ पर्यंत ५ हजार ३३० लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मागील आठ महिन्यात दोन हजार २०० लोकांना श्वान दंश झाला आहे. ही आकडेवारी महापालिकेसह शासकीय रुग्णालयांमधील आहे. परंतु याच्या दुप्पट लोक खासगी इस्पितळात जात असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.पश्चिम आणि पूर्वमध्ये सर्वात जास्त श्वानदंशउपराजधानीत सर्वात जास्त कुत्र्यांनी चावा पश्चिम व पूर्व नागपुरातील लोकांना घेतला आहे. मागील वर्षी पश्चिम व पूर्व नागपुरात आठ हजार लोकांना श्वानदंश झाला आहे. उत्तर नागपुरात एक हजार लोकांना, मध्य नागपुरात ६०० तर दक्षिण नागपुरात ५०० जणांना चावा घेतला आहे. कुत्र्यांच्या झुंडीकडे दुर्लक्षचशहरातील रस्त्यावर रात्री कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसून येतात. रात्रपाळी करून घरी परतणाऱ्या नागरिकांच्या अंगावर हीच मोकाट कुत्री धावून जातात. जाटतरोडी चौक ते मेडिकल चौक मार्ग, लोखंडी पूल ते शनिमंदिर, मानेवाडा रिंग रोड, उंटखाना चौक ते अशोक चौक, प्रतापनगर सिमेंट रोड ते गोपालनगर, काचीपुरा रामदासपेठ मार्ग, अभ्यंकरनगर रोड, सुगतनगर मार्ग, लष्करीबाग चौक ते वैशालीनगर चौक यासह जिथे-जिथे उघड्यावर मासविक्री होते तिथे-तिथे या झुंडी दिसून येतात. परंतु याकडे अद्यापही महापालिकेचे लक्ष नसल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)नसबंदी मोहिमेनंतरही कुत्र्यांची पिलावळवाढत्या श्वानदंशाला घेऊन २००६ मध्ये महानगरपालिकेने कुत्र्यांची नसबंदी मोहीम चालविली. परंतु २०११ मध्ये या मोहिमेवर आक्षेप घेतल्याने थंडबस्त्यात पडली. तब्बल तीन वर्षानंतर जुलै २०१४ पासून ही मोहीम पुन्हा सुरू झाली. कोल्हापूरच्या सोसायटी फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेला हे काम देण्यात आले आहे. एका कुत्र्याच्या नसबंदीवर महापालिकेचा ५२९ रुपये खर्च होत आहे. या संस्थेने जुलै महिन्यात २५८ तर आॅगस्ट महिन्यात ५३५ कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया केली. असे असताना गल्ली-बोळात आजही कुत्र्यांची पिलावळ दिसून येत आहे.