शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

आरटीईच्या ५,७२९ जागांसाठी २४,१६८ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:07 IST

६८० शाळांनी केली होती नोंदणी : कोरोनाच्या काळात पालकांकडून मिळाला उत्तम प्रतिसाद नागपूर : शिक्षण हक्क कायदा २००९ अंतर्गत ...

६८० शाळांनी केली होती नोंदणी : कोरोनाच्या काळात पालकांकडून मिळाला उत्तम प्रतिसाद

नागपूर : शिक्षण हक्क कायदा २००९ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांना नामांकित शाळेत प्रवेश घेण्याची संधी मिळाली आहे. नागपूर जिल्ह्यात २०१२ पासून आरटीईची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. हजारो विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत आठव्या वर्गापर्यंत नि:शुल्क शिक्षण यामुळे मिळाले आहे. नागपूर जिल्ह्यात आरटीईसाठी दरवर्षी पालकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. यंदाही ५,७२९ जागांसाठी २४,१६८ पालकांनी अर्ज केले आहेत.

विनाअनुदानित शाळांची लाखो रुपये फी भरणे सामान्य पालकाच्या आवाक्याबाहेर होते. आपलाही मुलगा चांगल्या शाळेत शिकावा, या पालकांच्या अपेक्षा आरटीईमुळे पूर्णत्वास आल्या. नागपुरात २०१२ पासून सुरू झालेल्या आरटीईच्या प्रक्रियेला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद लाभत आला आहे. गेल्या वर्षी ४० हजारापर्यंत अर्जांची संख्या गेली होती. कोरोना असतानाही ९० टक्के प्रवेश आरटीईअंतर्गत झाले. यावर्षी आरटीईची प्रक्रिया फेब्रुवारीपासून राबविण्यात आली. यावर्षी जिल्ह्यात ६८० शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केली. २५ टक्क्यानुसार यंदा ५,७२९ जागा आरक्षित करण्यात आल्या. ३ मार्चपासून पालकांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. ३० मार्चपर्यंत २४,१६८ पालकांनी आरटीईत नोंदणी केली होती.

- पॉईंटर

आरटीईअंतर्गत जिल्ह्यातील शाळांची नोंदणी - ६८०

एकूण जागा - ५,७२९

एकूण अर्ज - २४,१६८

- तालुकानिहाय आलेले अर्ज

तालुका अर्जांची संख्या

भिवापूर ७३

हिंगणा १४३२

कळमेश्वर ३२७

कामठी १२४२

काटोल ४६८

कुही १६८

मौदा ३५०

नागपूर ग्रामीण ३,७३९

नरखेड २५६

पारशिवनी २२६

रामटेक २७०

सावनेर ७५७

उमरेड ३९९

यूआरसी १ ११,९१४

यूआरसी २ १६१०

यूआरसी ३ २८९

यूआरसी ४ २५२

यूआरसी ५ ३९६

- आता लॉटरीकडे लक्ष

आरटीईची संपूर्ण प्रक्रिया संपलेली आहे. आता फक्त लॉटरीची प्रतीक्षा पालकांना आहे. लॉटरीद्वारे प्रवेश निश्चित केले जातील. पुणे येथून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एकाच वेळी सर्व जागांवर लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केल्या जाईल. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे राऊंड सुरू होईल. सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या आठवड्यात लॉटरी प्रक्रिया होणार असल्याची शक्यता आहे.

- पूर्वी ही प्रक्रिया महिनाभरापेक्षा जास्त चालायची. यावर्षी प्रवेश प्रक्रियेसाठी कमी कालावधी मिळाला. त्यातही तक्रारी यावेळी कमी झाल्या. लोकेशनमध्ये सुधारणा केली होती. सर्व्हरच्या अडचणी जाणवल्या नाही. सुरुवातीला ओटीपीच्या तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे आठवडाभरासाठी मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंतची प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. यापुढचीही प्रक्रिया सुरळीतच पार पडेल.

- चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक