शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

किसान रेल्वेमुळे जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 16:49 IST

गोधनी ते आदर्शनगर दिल्लीपर्यंत पहिली किसान रेल्वे पाठविण्यात आली. यात एकूण २०० टन संत्रा पाठविण्यात आला असून किसान रेल्वेच्या पहिल्याच फेरीतून रेल्वेला १ लाख ९८ हजार ४५२ रुपयांचा महसुल मिळाला. तर शेतकऱ्यांना ९७ हजार २८२ रुपयांचे अनुदान मिळाले.

ठळक मुद्देपहिली ऑरेंज किसान रेल्वे दिल्लीला रवाना : २०० टन संत्रा पाठविला

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी किसान रेल्वे सुरू केली आहे. किसान रेल्वेची पहिली फेरी बुधवारी २०० टन संत्रा घेऊन आदर्शनगर दिल्लीला रवाना झाली.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिझनेस डेव्हलपमेंट युनिटच्या अथक परीश्रमाने गोधनी ते आदर्शनगर दिल्लीपर्यंत पहिली किसान रेल्वे पाठविण्यात आली. या किसान रेल्वेचा फायदा काटोल, नरखेड, वरुड आणि मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथील शेतकऱ्यांना झाला. या किसान रेल्वेत एकूण २०० टन संत्रा पाठविण्यात आला. किसान रेल्वेच्या पहिल्याच फेरीतून रेल्वेला १ लाख ९८ हजार ४५२ रुपयांचा महसुल मिळाला. तर शेतकऱ्यांना ९७ हजार २८२ रुपयांचे अनुदान मिळाले. ही किसान रेल्वे प्रत्येक बुधवारी गोधणी ते आदर्शनगर दिल्ली आणि प्रत्येक शनिवारी वरुड ते शालीमार धावणार आहे.

मागील वर्षी रेल्वेला मिळाले २.५ कोटी रुपये

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात २०२० मध्ये किसान रेल्वे चालविण्यास सुरुवात झाली. मागील वर्षीही शेतकऱ्यांनी किसान रेल्वेला भरघोस प्रतिसाद दिला होता. मागील वर्षी २९ किसान रेल्वेच्या माध्यमातून एकुण ७५०० टन संत्र्याची वाहतुक करण्यात आली होती. यातील १८ किसान रेल्वे शालीमारला, तर ११ किसान रेल्वे आदर्शनगर दिल्ली येथे पाठविण्यात आल्या होत्या. यात व्यापारी आणि शेतकऱ्यांना १.५ कोटी रुपयांचे थेट अनुदान मिळाले होते. तर रेल्वेलाही २.१५ कोटी रुपयांचा महसुल किसान रेल्वेच्या माध्यमातून मिळाला होता.

टॅग्स :railwayरेल्वेFarmerशेतकरीagricultureशेती