शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

किसान रेल्वेमुळे जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 16:49 IST

गोधनी ते आदर्शनगर दिल्लीपर्यंत पहिली किसान रेल्वे पाठविण्यात आली. यात एकूण २०० टन संत्रा पाठविण्यात आला असून किसान रेल्वेच्या पहिल्याच फेरीतून रेल्वेला १ लाख ९८ हजार ४५२ रुपयांचा महसुल मिळाला. तर शेतकऱ्यांना ९७ हजार २८२ रुपयांचे अनुदान मिळाले.

ठळक मुद्देपहिली ऑरेंज किसान रेल्वे दिल्लीला रवाना : २०० टन संत्रा पाठविला

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी किसान रेल्वे सुरू केली आहे. किसान रेल्वेची पहिली फेरी बुधवारी २०० टन संत्रा घेऊन आदर्शनगर दिल्लीला रवाना झाली.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिझनेस डेव्हलपमेंट युनिटच्या अथक परीश्रमाने गोधनी ते आदर्शनगर दिल्लीपर्यंत पहिली किसान रेल्वे पाठविण्यात आली. या किसान रेल्वेचा फायदा काटोल, नरखेड, वरुड आणि मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथील शेतकऱ्यांना झाला. या किसान रेल्वेत एकूण २०० टन संत्रा पाठविण्यात आला. किसान रेल्वेच्या पहिल्याच फेरीतून रेल्वेला १ लाख ९८ हजार ४५२ रुपयांचा महसुल मिळाला. तर शेतकऱ्यांना ९७ हजार २८२ रुपयांचे अनुदान मिळाले. ही किसान रेल्वे प्रत्येक बुधवारी गोधणी ते आदर्शनगर दिल्ली आणि प्रत्येक शनिवारी वरुड ते शालीमार धावणार आहे.

मागील वर्षी रेल्वेला मिळाले २.५ कोटी रुपये

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात २०२० मध्ये किसान रेल्वे चालविण्यास सुरुवात झाली. मागील वर्षीही शेतकऱ्यांनी किसान रेल्वेला भरघोस प्रतिसाद दिला होता. मागील वर्षी २९ किसान रेल्वेच्या माध्यमातून एकुण ७५०० टन संत्र्याची वाहतुक करण्यात आली होती. यातील १८ किसान रेल्वे शालीमारला, तर ११ किसान रेल्वे आदर्शनगर दिल्ली येथे पाठविण्यात आल्या होत्या. यात व्यापारी आणि शेतकऱ्यांना १.५ कोटी रुपयांचे थेट अनुदान मिळाले होते. तर रेल्वेलाही २.१५ कोटी रुपयांचा महसुल किसान रेल्वेच्या माध्यमातून मिळाला होता.

टॅग्स :railwayरेल्वेFarmerशेतकरीagricultureशेती