जिल्हा परिषद : २०१६ पर्यंत सर्व योजना मार्गी लागणारनागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ३००ते ३५० गावात कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाई निर्मांण होते. तात्पुरत्या उपाययोजना म्हणून टंचाई निवारणाचा कार्यक्र म राबविला जातो. पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने डिसेंबर २०१६ पर्यंत २२९ योजना कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे. यावर ४५कोटींचा खर्च अपेक्षित आहे.राष्ट्रीय पेयजल कार्यक्र माच्या माध्यमातून या योजना राबविल्या जात आहे. २०१४-१५ या वर्षात १११ तर २०१५-१६ या वर्षात ११८ योजना कार्यान्वित होणार आहे. मे २०१४ पर्यंत यातील ८० योजना पूर्ण झाल्या आहेत. १३ योजनांची कामे प्रगतीपथावर असून जून अखेरीस ९० योजना मार्गी लागणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिवकुमार शर्मा यांनी दिली.पुढील वर्षात अपेक्षित असलेल्या १३ योजनांची कामे हाती घेण्यात आली आहे. यात कामठी तालुक्यातील चार, पारशिवनी, रामटेक व सावननेर तालुक्यातील प्रत्येकी दोन तर काटोल, कुही व नागपूर ग्रामीण मधील प्रत्येकी एका योजनेचा समावेश आहे. ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी शुद्ध व आवश्यक पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. ही बाब विचारात घेता, ज्या गावात दरडोई ४० लिटर पाण्याचा पुरवठा होत नाही. गावातील जलस्रोत प्रदूषित असेल तर अशा गावांचा राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मात प्राधान्याने समावेश केला जातो.पाण्याची समस्या दूर व्हावी यासाठी योजना राबविल्या जात असल्या तरी योजना राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तांत्रिक मान्यतेच्या प्रतीक्षेत योजनांना विलंब होतो. त्यामुळे योजनावरील वाढीव खर्चाला मंजुरी घ्यावी लागते. अनेकदा निधीचा पहिला हप्ता मिळतो. परंतु दुसरा व तिसरा हप्ता वेळेवर मिळत नाही यामुळे योजनांना विलंब होतो. उन्हाळ्यातील टंचाई निवारणासाठी यंदा ३,५०,००००० चे नियोजन करण्यात आले आहे. टँकर व विहीर खोलीकरणासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला. परंतु कूपनलिका व नळयोजनांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाललेला नाही. (प्रतिनिधी)
२२९ पाणी पुरवठा योजनांचे नियोजन
By admin | Updated: June 16, 2014 01:04 IST