शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

२२९ पाणी पुरवठा योजनांचे नियोजन

By admin | Updated: June 16, 2014 01:04 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ३००ते ३५० गावात कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाई निर्मांण होते. तात्पुरत्या उपाययोजना म्हणून टंचाई निवारणाचा कार्यक्र म राबविला जातो.

जिल्हा परिषद : २०१६ पर्यंत सर्व योजना मार्गी लागणारनागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ३००ते ३५० गावात कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाई निर्मांण होते. तात्पुरत्या उपाययोजना म्हणून टंचाई निवारणाचा कार्यक्र म राबविला जातो. पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने डिसेंबर २०१६ पर्यंत २२९ योजना कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे. यावर ४५कोटींचा खर्च अपेक्षित आहे.राष्ट्रीय पेयजल कार्यक्र माच्या माध्यमातून या योजना राबविल्या जात आहे. २०१४-१५ या वर्षात १११ तर २०१५-१६ या वर्षात ११८ योजना कार्यान्वित होणार आहे. मे २०१४ पर्यंत यातील ८० योजना पूर्ण झाल्या आहेत. १३ योजनांची कामे प्रगतीपथावर असून जून अखेरीस ९० योजना मार्गी लागणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिवकुमार शर्मा यांनी दिली.पुढील वर्षात अपेक्षित असलेल्या १३ योजनांची कामे हाती घेण्यात आली आहे. यात कामठी तालुक्यातील चार, पारशिवनी, रामटेक व सावननेर तालुक्यातील प्रत्येकी दोन तर काटोल, कुही व नागपूर ग्रामीण मधील प्रत्येकी एका योजनेचा समावेश आहे. ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी शुद्ध व आवश्यक पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. ही बाब विचारात घेता, ज्या गावात दरडोई ४० लिटर पाण्याचा पुरवठा होत नाही. गावातील जलस्रोत प्रदूषित असेल तर अशा गावांचा राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मात प्राधान्याने समावेश केला जातो.पाण्याची समस्या दूर व्हावी यासाठी योजना राबविल्या जात असल्या तरी योजना राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तांत्रिक मान्यतेच्या प्रतीक्षेत योजनांना विलंब होतो. त्यामुळे योजनावरील वाढीव खर्चाला मंजुरी घ्यावी लागते. अनेकदा निधीचा पहिला हप्ता मिळतो. परंतु दुसरा व तिसरा हप्ता वेळेवर मिळत नाही यामुळे योजनांना विलंब होतो. उन्हाळ्यातील टंचाई निवारणासाठी यंदा ३,५०,००००० चे नियोजन करण्यात आले आहे. टँकर व विहीर खोलीकरणासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला. परंतु कूपनलिका व नळयोजनांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाललेला नाही. (प्रतिनिधी)