शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

नागपूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेसाठी २१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 11:03 IST

कामठी तालुक्यातील खसाळा, मसाळा, खैरी व भिलगाव या चार गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी यापूर्वीच २१ कोटी रुपये शासनाने दिले असताना अजून पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली नाही. या चारही गावांची पाणीपुरवठा योजना येत्या दिवाळीपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देदिवाळीपर्यंत चारही गावची योजना पूर्ण करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी तालुक्यातील खसाळा, मसाळा, खैरी व भिलगाव या चार गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी यापूर्वीच २१ कोटी रुपये शासनाने दिले असताना अजून पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली नाही. या चारही गावांची पाणीपुरवठा योजना येत्या दिवाळीपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले.मजिप्राने पाणीपुरवठ्याच्या योजना निधी असूनही पूर्ण न केल्यामुळे या गावांना अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. खसाळा मसाळा येथील जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री बावनकुळे यांनी वरील निर्देश दिले. याप्रसंगी अनिल निधान, योगेश वाडीभस्मे, नरेश मोटघरे, सरपंच रवी पारधी, मोहन माकडे, सरपंच शीतल पाटील, सरपंच बंडूजी कापसे, देवराव डाखोळे, सरपंच शरद माकडे, उपसरपंच सुनीता वैरागडे, गुणवंता माकडे, शिवचरण शंभरकर, सुधीर जांभुळकर व अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, नागरिकांकडून आलेल्या नियमानुसार असलेल्या सर्व अर्जांवर कारवाई होईल. नियमानुसार नसेल तर ते काम होणार नाही. याप्रसंगी आलेल्या अर्जांमध्ये ७० टक्के पेक्षा जास्त अर्ज ग्रामपंचायतींशी संबंधित आहेत. ग्रामपंचायतींनी कामे न केल्यामुळे लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.तहसिलदारांनी पंतप्रधान किसान सन्मान योजना, वर्ग २ चे वर्ग १ मध्ये केलेली प्रकरणे, विशेष सहाय योजना, संजय गांधी निराधार योजना, अन्नसुरक्षा योजना, अंत्योदय या योजनेंतर्गत झालेल्या कामांची माहिती दिली. गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीअंतर्गत येणाºया योजनांची तसेच घरकुलाच्या योजनेचा आढावा घेतला.१०४५ घरकुले पूर्ण झाल्याचे सांगितले. घरकुलांपासून कुणीही पात्र लाभार्थी वंचित राहिला तर सरपंच आणि सचिवाला जबाबदार धरण्यात येणार आहे.महिला बचत गटाला देण्यात येणाºया कर्जाचे ७ टक्के राज्य शासन आणि ५ टक्के व्याज केंद्र शासन भरणार असल्याचा निर्णय झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. बचत गटाला मिळणारे कर्ज हे शून्य टक्के व्याजाचे राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या कामाची माहिती दिली. महावितरणने गेल्या साडेचार वर्षात जिल्ह्याला ११०० कोटी रुपये मिळाल्याचे सांगितले. आतापर्यंत ४० उपकेंद्र उभारण्यात आले आहे. याशिवाय आॅनलाईन वीज बिल, मोबाईल वॅलेट, ग्राहक मेळावे आदींची माहिती देण्यात आली.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प