शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांसाठी २०२४ घातक वर्ष, १८८ हून अधिक जणांचा खात्मा, सुरक्षा यंत्रणांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे नक्षलवादी कोंडीत

By योगेश पांडे | Updated: October 4, 2024 23:59 IST

Naxalite Movement: २०२४ हे तेथील नक्षलवाद्यांसाठी घातक वर्ष ठरले आहे. आतापर्यंत या वर्षातील २७७ दिवसांमध्ये १८८ हून अधिक नक्षलवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले आहे.

- योगेश पांडे  नागपूर - छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३० नक्षलवाद्यांचा खात्मा केला. २०२४ हे तेथील नक्षलवाद्यांसाठी घातक वर्ष ठरले आहे. आतापर्यंत या वर्षातील २७७ दिवसांमध्ये १८८ हून अधिक नक्षलवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले आहे. काही दिवसांअगोदर नागपुरात बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी काही महिन्यांतच नक्षलवाद्यांवर मोठ्या कारवाया होणार असल्याचे संकेत दिले होते, हे विशेष.

मागील काही कालावधीपासून नक्षलवादाविरोधात सुरक्षा यंत्रणांनी ‘नो टॉलरन्स’चे धोरण अवलंबिले आहे. ज्या नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात यायचे आहे, त्यांना परत येण्याची संधी दिली जात आहे; परंतु जे नक्षलवादाचा मार्ग सोडत नाहीत, त्यांना सापळा रचून टिपले जात आहे. छत्तीसगडमधील १५ जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी कारवाया सुरू आहेत. यात बस्तर, बिजापूर, दंतेवाडा, धमतरी, गरियाबंद, कांकेर, कोंडागाव, महासमुंद, नारायणपूर, राजनांदगाव, अंबागढ, खैरागढ, सुकमा, कबीरधाम, मुंगेल या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यातही दक्षिण छत्तीसगडमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रातील गडचिरोलीतील बरेच नक्षलवादी समूहदेखील त्या भागात स्थलांतरित झाले. २०२४ मध्ये आतापर्यंत १८८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, तर सातशेहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. जवळपास तेवढ्याच नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

मागील काही वर्षांतील सर्वांत मोठी कारवाईशुक्रवारी झालेली कारवाई ही मागील काही काळातील सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. १६ एप्रिल रोजी बस्तरमध्ये २९ नक्षलवाद्यांना चकमकीत ठार मारण्यात आले होते. २०१६ मधील एका चकमकीत ३० जणांना कंठस्नान घालण्यात आले होते, तर २०२१ मध्ये २५ नक्षलवाद्यांना संपविण्यात आले होते.

२००९ नंतरचा सर्वाधिक संहारकेंद्र शासनाच्या आकडेवारीनुसार देशभरात १ जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत जवळपास सातशे नक्षलवाद्यांना विविध चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी ठार केले. २००९ साली १५४ नक्षलवाद्यांना मारण्यात आले होते. यावर्षीचा आकडा दोनशेहून अधिकवर पोहोचला आहे.

नक्षलवादावर असा होतोय प्रहार- २०१० च्या तुलनेत हिंसेच्या प्रकरणात ७३ टक्क्यांची घट- २०२४ मध्ये नक्षल गतिविधींमध्ये ३२ टक्क्यांची घट- ११ वर्षांत नक्षलप्रभावित जिल्हे १२६ वरून ३८ वर

टॅग्स :naxaliteनक्षलवादीDefenceसंरक्षण विभागMaharashtraमहाराष्ट्रChhattisgarhछत्तीसगड