शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

स्मशान घाटावर राबताहेत दिवस-रात्र २०० कोरोना योद्धे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वर्षभरापासून कोरोना संकट आहे. शहरातील मृतांचा आकडा पाच हजाराच्या वर गेला आहे. महापालिकेच्या आरोग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्षभरापासून कोरोना संकट आहे. शहरातील मृतांचा आकडा पाच हजाराच्या वर गेला आहे. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर टीका होत असली तरी

कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह आणण्यापासून तर अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडण्याची कौतुकास्पद कामगिरी मनपाचे सफार्ई कर्मचारी पार पाडत आहेत. यात झोनस्तरावरील कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. यासाठी तब्बल २०० कर्मचारी दिवस-रात्र राबताहेत. यातील ७० ते ८० सफाई कर्मचारी वर्षभरापासून हे सेवाकार्य करीत आहेत. आरोग्य सेवेतील कर्मचारी कोरोना योद्धा आहेतच. पण स्मशान घाटावर दिवस-रात्र राबणारे सफाई कर्मचारी खरे कोरोना योद्धा आहेत.

एप्रिल महिन्यात शहरातील दहनघाट व कब्रस्तानावर दररोज ३०० ते ४०० अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी घाटावर प्रतीक्षा करावी लागत होती. सकाळपासून तर रात्री १० ते ११ वाजेपर्यंत मनपाचे कर्मचारी अंत्यसंस्कार करीत होते. अजूनही परिस्थिती गंभीर आहे. मृतांचा आकडा काहीसा कमी झाला तरी घाटावरील गर्दी कायम आहे.

कोरोबा बाधितांचा मृत्यू झाल्यास संक्रमणाच्या भीतीमुळे रक्तातील नात्यातील लोक अंत्यसंस्कार करण्याचे टाळतात. पण आपला जीव धोक्यात घालून मनपाचे कर्मचारी ही जबाबदारी पार पाडत आहे. यासाठी ३० शववाहिका कार्यरत आहेत. झोनस्तरावरून याचे नियंत्रण केले जाते. बाधिताचा मृत्यू झाल्यास कोरोना वॉर रूमला याची माहिती मिळताच शववाहिका पाठविली जाते. रुग्णालय अथवा घरून मृतदेह घाटावर नेल्यानंतर अंत्यसंस्कारही पथकातील कर्मचाऱ्यांनाच करावे लागतात.

...

वर्षभरात जिल्ह्यात कोरोनामुळे झालेले मृत्यू - ८,१९३

कोरोनामुळे शहरात झालेले मृत्यू - ४,९५२

कोरोनामुळे ग्रामीणमध्ये झालेले मृत्यू - २,०६६

कोरोनामुळे जिल्ह्याबाहेरील मृत्यू - १,१७५

....

शहरातील दहनघाट-१६

मुस्लीम कब्रस्तान -१०

ख्रिश्चन कब्रस्तान -८

एकूण -३४

....

शववाहिका -३०

मनपाच्या -२०(१६ शहर बस)

खासगी -१०

....

एका अंत्यसंस्काराला लागतात दोन तास

अंत्यसंस्कारासाठी १५ पथक गठित करण्यात आले आहेत. मृतदेह रुग्णालयातून घाटावर आणणे, त्यावर अंत्यसंस्कार करणे, या प्रक्रियेसाठी पथकाला दीड ते दोन तास लागतात. अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच दुसरा कॉल येतो. हा क्रम दिवसभर सुरू असतो. पीपीई किट घालून आठ ते दहा तास काम करावे लागत आहे.

....

बेवारस मृतदेहाचे हेच वारस

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यात अनेक बेवारस मृतांचा समावेश असतो. अशा बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनाच करावे लागतात. बेवारस मृतदेहाचे आपणच वारस म्हणून पथकातील कर्मचाऱ्यांना अंत्यसंस्कार करावे लागतात.