शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

वन्यप्राणी हल्ल्यातील प्राणहानीसाठी आता २० लाख रुपये भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2022 19:48 IST

Nagpur News वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास यापुढे २० लक्ष रुपये तर गाय, बैल, म्हैस या जनावरांचा मृत्यू झाल्यास ७० हजार रुपये भरपाई मिळेल.

ठळक मुद्देपाळीव जनावरांचा मृत्यू झाल्यासही मुदतवाढ

नागपूर : वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, लांडगा, तरस, काेल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी तसेच पशुधनाचा मृत्यू किंवा जखमी झाल्यास मिळणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये वाढ करण्यात आली आहे. यानुसार वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास यापुढे २० लक्ष रुपये तर गाय, बैल, म्हैस या जनावरांचा मृत्यू झाल्यास ७० हजार रुपये भरपाई मिळेल.

विविध कालावधीत झालेल्या शासन निर्देशानुसार वन्यप्राणी हल्ल्यात मनुष्य हानी किंवा अपंगत्व आल्यास तसेच पशुधनाची हानी झाल्यास नुकसान भरपाई मिळते. मात्र हे अर्थसहाय्य कमी असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी सातत्याने केली जात हाेती. त्यानुसार राज्य शासनाच्या वने व महसूल विभागातर्फे नुकसान भरपाईत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना २० लक्ष रुपये देण्यात येतील. यातील १० लक्ष रुपयाचा धनादेश व उर्वरित १० लक्ष रुपये संबंधितांच्या खात्यात फिक्स डिपाॅझिट करण्यात येतील. हल्ल्यात व्यक्ती कायमस्वरुपी अपंग झाल्यास ५ लक्ष रुपये, गंभीर जखमी झाल्यास १.२५ लाख रुपये तर किरकाेळ जखमी झाल्यास औषधाेपचारासाठी २० हजार रुपये अर्थसहाय्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गाय,म्हैस व बैल यांचा प्राणी हल्ल्यात मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या किमतीच्या ७५ टक्के किवा ७० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजारभाव किंमतीच्या ५० टक्के किंवा १५ हजार रुपये मिळतील. गाय, म्हैस, बकरी, बैल, मेंढी व इतर पशुधन जखमी झाल्यास बाजारभाव किंमतीच्या २५ टक्के किंवा ५००० रुपये प्रती जनावर भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अटी व शर्थी पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे कायम राहणार असल्याचे नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवGovernmentसरकार