शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

वन्यप्राणी हल्ल्यातील प्राणहानीसाठी आता २० लाख रुपये भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2022 19:48 IST

Nagpur News वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास यापुढे २० लक्ष रुपये तर गाय, बैल, म्हैस या जनावरांचा मृत्यू झाल्यास ७० हजार रुपये भरपाई मिळेल.

ठळक मुद्देपाळीव जनावरांचा मृत्यू झाल्यासही मुदतवाढ

नागपूर : वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, लांडगा, तरस, काेल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी तसेच पशुधनाचा मृत्यू किंवा जखमी झाल्यास मिळणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये वाढ करण्यात आली आहे. यानुसार वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास यापुढे २० लक्ष रुपये तर गाय, बैल, म्हैस या जनावरांचा मृत्यू झाल्यास ७० हजार रुपये भरपाई मिळेल.

विविध कालावधीत झालेल्या शासन निर्देशानुसार वन्यप्राणी हल्ल्यात मनुष्य हानी किंवा अपंगत्व आल्यास तसेच पशुधनाची हानी झाल्यास नुकसान भरपाई मिळते. मात्र हे अर्थसहाय्य कमी असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी सातत्याने केली जात हाेती. त्यानुसार राज्य शासनाच्या वने व महसूल विभागातर्फे नुकसान भरपाईत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना २० लक्ष रुपये देण्यात येतील. यातील १० लक्ष रुपयाचा धनादेश व उर्वरित १० लक्ष रुपये संबंधितांच्या खात्यात फिक्स डिपाॅझिट करण्यात येतील. हल्ल्यात व्यक्ती कायमस्वरुपी अपंग झाल्यास ५ लक्ष रुपये, गंभीर जखमी झाल्यास १.२५ लाख रुपये तर किरकाेळ जखमी झाल्यास औषधाेपचारासाठी २० हजार रुपये अर्थसहाय्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गाय,म्हैस व बैल यांचा प्राणी हल्ल्यात मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या किमतीच्या ७५ टक्के किवा ७० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजारभाव किंमतीच्या ५० टक्के किंवा १५ हजार रुपये मिळतील. गाय, म्हैस, बकरी, बैल, मेंढी व इतर पशुधन जखमी झाल्यास बाजारभाव किंमतीच्या २५ टक्के किंवा ५००० रुपये प्रती जनावर भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अटी व शर्थी पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे कायम राहणार असल्याचे नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवGovernmentसरकार