शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

मानवी मूल्ये पायदळी तुडविणाऱ्यांचाच गौरव, हे देशाचे दुर्दैव; एकोणिसाव्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 19:05 IST

Nagpur News देशाला जोडणाऱ्यांना बाजुला सारून देशाची शकले पाडत मानवी मूल्य पायदळी तुडविणाऱ्यांचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला, हे आपले दुर्दैव असल्याची खंत माजी खासदार आणि ‘पांचजन्य’चे संपादक तरुण विजय यांनी शनिवारी नागपूर येथे व्यक्त केली.

नागपूर : तळागाळातल्या माणसांचा आवाज झालेल्यांचा इतिहास सांगण्याऐवजी परकीय आक्रमणांच्या क्रौर्याचा इतिहास आपल्या माथी मारला गेला. देशाला जोडणाऱ्यांना बाजुला सारून देशाची शकले पाडत मानवी मूल्य पायदळी तुडविणाऱ्यांचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला, हे आपले दुर्दैव असल्याची खंत माजी खासदार आणि ‘पांचजन्य’चे संपादक तरुण विजय यांनी शनिवारी नागपूर येथे व्यक्त केली.

समरसता साहित्य परिषदेच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य व समरसतेवर आधारित द्विदिवसीय १९व्या समरसता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, माजी संमेलनाध्यक्ष व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे, समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. ईश्वर नंदपुरे, कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील, निमंत्रक सुनील वारे, सहनिमंत्रक डॉ. सुनील भडंगे, प्रा. संजय गायकवाड, संमेलनाचे कार्यवाह डॉ. राजेंद्र नाईकवाडे उपस्थित होते. संमेलनाचे माजी अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी विद्यमान अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांना संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे प्रदान केली. यावेळी तरुण विजय यांच्या हस्ते संमेलन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

रंजल्या-गांजल्यांचे अश्रू पुसणे आपली संस्कृती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत शोषितांचा आवाज बुलंद केला. जगण्या-मरण्यातील दुःख, वेदना, संघर्ष हा अण्णा भाऊंच्या साहित्यातला आत्मा आहे. त्यामुळे अण्णा भाऊ हे खऱ्या अर्थाने समरसतेचे दधिची होत. साहित्य हे समाजाला जोडण्याचे काम करते. द्वेषाच्या विषाची बीजे पेरून कोणताही देश उभा राहू शकत नाही. वंचितांच्या वेदनांचा हुंकार झालेले साहित्य हे समाजाला भानावर आणत असते. त्यामुळे वेदनेतून जन्मलेले साहित्य हे उच्च वर्णाहून किंचितही कमी लेखता येत नाही, असेही तरुण विजय यावेळी म्हणाले. प्रास्ताविक डॉ. प्रसन्न पाटील यांनी तर सुनील वारे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन विवेक अलोणी आणि शलाका जोशी यांनी केले. डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी आभार मानले तर डॉ. जयश्री शास्त्री यांनी पसायदान सादर केले.

ग्रंथदिंडीने वातावरणनिर्मिती

उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यांत एनएसएसच्या विद्यार्थिंनी व महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सुवासिनींनी तरुण विजय, डॉ. अक्षयकुमार काळे व इतर मान्यवरांचे औक्षण केले व त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर रांगोळी प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

प्रतिगामी शक्तीला जनशक्ती उद्ध्वस्त करू शकते - अक्षयकुमार काळे

प्रतिगामी शक्ती कितीही मजबूत असल्या तरी त्यांना जनशक्तीच्या माध्यमातून पूर्णपणे उद्ध्वस्त करता येते, याची शिकवण अण्णा भाऊंचे साहित्य देते. त्यांचे साहित्य धगधगत्या ज्वालामुखी असून ते ज्वलंत मनोवृत्तीचे आहे, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी यावेळी व्यक्त केले.

............

टॅग्स :literatureसाहित्य