शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेच्या प्रकोपमुळे १९ राज्ये प्रभावित : व्ही. तिरुपुगूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:39 IST

वाढत्या जागतिक तापमानामुळे तसेच ओझनचा खालावलेला स्तर यामुळे देशात उष्णतेची तीव्रता अधिक असणाऱ्या राज्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सन २००५ मध्ये देशात उष्णतेच्या प्रकोपामुळे १५ राज्ये प्रभावित झाली होती. परंतु वाढत्या तापमान वाढीमुळे सन २०१८ मध्ये हा आकडा वाढत जाऊन १९ एवढा झाला, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे संयुक्त सचिव डॉ. व्ही. तिरुपुगूज यांनी येथे दिली.

ठळक मुद्देसुरक्षिततेसाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढत्या जागतिक तापमानामुळे तसेच ओझनचा खालावलेला स्तर यामुळे देशात उष्णतेची तीव्रता अधिक असणाऱ्या राज्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सन २००५ मध्ये देशात उष्णतेच्या प्रकोपामुळे १५ राज्ये प्रभावित झाली होती. परंतु वाढत्या तापमान वाढीमुळे सन २०१८ मध्ये हा आकडा वाढत जाऊन १९ एवढा झाला, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे संयुक्त सचिव डॉ. व्ही. तिरुपुगूज यांनी येथे दिली.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए), महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर तसेच मध्य भारतातील उन्हाळ्यातील उष्णतेची लाट नियंत्रित करण्याबाबतच्या नियोजनासाठी लक्ष्मीनगर येथील हॉटेल अशोक येथे दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एनडीएमएचे सदस्य डॉ. डी. एन. शर्मा, लेफ्टनंट जनरल एन. एन. मारवाह, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अरुण उन्हाळे, डॉ. दिलीप मालवणकर प्रामुख्याने उपस्थित होते.मानव तसेच जनावरांचे उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू थांबविणे हा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या हिट अ‍ॅक्शन प्लॅनचा मूळ उद्देश आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कार्यशाळेमुळे राज्य शासनाला उष्णता प्रतिबंधक आराखडा आणि उपाययोजना राबविण्यासाठी सहायभूत ठरेल. तेव्हा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने उष्णतेमुळे प्रभावित राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित राज्यांनी याची आतापासूनच अंमलबजावणी सुरु करावी, असे निर्देश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे संयुक्त सचिव डॉ. व्ही. तिरुपुगूज यांनी दिलेत.एनडीएमएच्यावतीने उष्णतावाढ प्रतिबंधासाठी तत्त्वानुसार हिट वेव्ह अ‍ॅक्शन प्लॅन तयार करुन त्याची व्यापक स्वरुपात प्रसिद्धी आणि अंमलबजावणी करण्याबाबत या कार्यशाळेमध्ये भर देण्यात आला. सन २०१७ पासून राष्ट्रीय स्तरावर हिट वेव्ह अ‍ॅक्शन प्लॅन कार्यशाळा घेतल्या जातात. यंदाची नागपूर येथे आयोजित करण्यात आलेली ही तिसरी कार्यशाळा होय.नागपूरसह विदर्भात उष्णतेचा प्रकोप वाढणारनागपूर शहरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर एनडीएमएमार्फत वातावरणातील बदल, दिवसेंदिवस उष्णतेचा वाढता प्रकोप यावर विशेष तज्ज्ञांमार्फत हिट वेव्ह अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. नागपूर तसेच मध्य भारताला यंदा अधिक तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने तीव्र उष्णतेचा तडाखा ज्या संबंधित राज्यांना बसू शकतो, अशा राज्यांना उष्णतेच्या प्रकोपापासून वाचविणे, अधिक तीव्र उष्णतेच्या नवीन ठिकाणांचा शोध घेणे तसेच सामान्य नागरिकांना यापासून सुरक्षित ठेवण्याकरिता यावेळी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.

 

टॅग्स :Temperatureतापमानweatherहवामान