शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

माय गॉड... रेल्वेत बेशिस्त प्रवाशांचा कळस; विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांवर बडगा!

By नरेश डोंगरे | Updated: October 15, 2024 20:53 IST

सहा महिन्यात आढळले १९ लाखांवर प्रवासी.

नरेश डोंगरे - नागपूर , लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वारंवार कारवाई करूनही फुकटे तसेच बेशिस्त प्रवासी जुमानायला तयार नसल्याचे एकदा उघड झाले आहे. रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील विविध मार्गावर राबविलेल्या तिकिट तपासणी मोहिमेत तब्बल १९ लाखांपेक्षाही जास्त फुकटे तसेच बेशिस्त प्रवासी आढळले. एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या सहा महिन्यात ही तिकिट तपासणी मोहिम राबविण्यात आली होती.

मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये मार्च, एप्रिल महिन्यापासून अचानक अनपेक्षित गर्दी वाढली. एसी कोचचे तिकिट नसतानादेखिल अनेक प्रवासी एसी कोचमध्ये शिरून प्रवास करीत असल्याच्याही तक्रार वाढल्या. त्यामुळे विविध गाड्यांमध्ये रेल्वे स्टाफने १ एप्रिल पासून आकस्मिक तिकिट तपासणी मोहिम राबविणे सुरू केले. विविध गाड्या आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे तिकिट तपासले जाऊ लागले. त्यात रेल्वेचे अधिकारीही चक्रावले. अनेक प्रवासी विनातिकिट प्रवासी करीत होते आणि काही प्रवासी तर जनरलचे तिकिट असताना चक्क एसी कोचमध्ये शिरून प्रवास करीत असल्याचे उघड झाले. परिणामी रेल्वे प्रशासनाने १ एप्रिल पासून सुरू केलेली ही तिकिट तपासणी मोहिम ३० सप्टेंबरपर्यंत राबविली. त्यात रेल्वे स्टाफला १९ लाख, ९ हजार फुकटे आणि बेशिस्त प्रवासी हाती लागले. त्यांच्यामुळेच रेल्वे गाड्यांमधील गर्दी वाढल्याचे आणि विनाकारण दुसऱ्या प्रवाशांना त्रास होत असल्याचे स्पष्ट झाले.---------------------------

दंडाची रक्कम १११.६२ कोटीउपरोक्त ६ महिन्यांच्या तिकिट तपासणीत आढळलेल्या विनातिकिट आणि बेशिस्त प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने १११ कोटी, ६२ लाख रुपयांचा दंड वसूल केला.

१३ हजार गाड्यातून अडीच लाख बेशिस्तांची हकालपट्टी

गाड्यांमधील वाढलेल्या गर्दीची कारणे तपासतानाच गर्दी नियंत्रित करण्यासाठी १४ जून ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत रेल्वे प्रशासनाने वेगळीच तपासणी हाती घेतली. त्यात १२,९३० गाड्यांमध्ये रिझर्वेशन नसताना देखिल २ लाख, ५४ हजार, ७९५ प्रवासी चढल्याचे आढळले. त्यांना या कोचमधून बाहेर काढण्यात आले. त्यासाठी रेल्वेने क्विक रिस्पॉन्स टीमची मदत घेतली.

टॅग्स :railwayरेल्वे