शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

नागपूर विभागात आठ महिन्यात शिवशाहीचे १९ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:22 PM

जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

ठळक मुद्देप्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हएसटी महामंडळाने उपाययोजना करण्याची गरज

दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाच्या ताफ्यात प्रवाशांच्या सुविधेसाठी वातानुकूलित शिवशाही बसेस दाखल झाल्या. शिवशाही बसेसला प्रवाशांनी पसंतीही दर्शविली. परंतु अपघातांच्या बाबतीत मात्र शिवशाही बसेस सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.एसटी महामंडळाने आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरविण्यासाठी शिवशाही बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल केल्या. खासगी वाहतुकीच्या स्पर्धेला तोंड देण्याच्या उद्देशाने महामंडळाने उचललेले हे पाऊल यशस्वी ठरले आणि प्रवाशांचाही शिवशाही बसेसला प्रतिसाद मिळाला. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिवशाही बसेसवर प्रश्नचिन्ह लागले आहे. एसटीच्या नागपूर विभागात एकूण ५६ शिवशाही बसेस आहेत. यात एसटीच्या मालकीच्या २९ आणि खासगी वाहतूकदाराच्या २७ बसेसचा समावेश आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या आठ महिन्यांच्या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यात जानेवारी महिन्यात २, फेब्रुवारीत २, मार्च १, एप्रिल ३, मे १, जून २, जुलै २, ऑगस्ट २, सप्टेंबर २ आणि ऑक्टोबर महिन्यात २ अपघात घडले आहेत. शिवशाही बसेसच्या अपघातांची ही आकडेवारी पाहून प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शिवशाहीची सेवा प्रवाशांसाठी चांगली आहे. परंतु अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने ठोस उपाययोजना केल्यास या बसेसकडे प्रवाशांचा ओढा वाढू शकतो, हेही तेवढेच खरे आहे.

खासगी बसेसवर अकुशल चालकशिवशाही बसेसच्या अपघातांचा आढावा घेतला असता या बसेसवर अकुशल चालक असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. खासगी वाहतूकदाराकडून चालकाची नेमणूक करताना त्यांना ४८ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत नाही. चालकाला विश्रांतीची योग्य वेळ मिळते की नाही, याची शहानिशा करण्यात येत नाही. याशिवाय शिवशाही बसेसचा वेग अधिक असल्यामुळे या गाड्या नियंत्रित होत नाहीत.नेहमीच चालकांची चूक नसते‘रस्त्यावर अनेक वाहने धावतात. अपघात झाल्यानंतर नेहमीच शिवशाही बसेसच्या चालकाची चूक असते असे नाही. अनेकदा दुसरी वाहने शिवशाही बसेसवर येऊन आदळतात. खराब रस्तेही याला कारणीभूत आहेत. त्यामुळे चालकांवर दोष देणे चुकीचे आहे.’-संजय रामटेके, प्रभारी विभागीय नियंत्रक, नागपूर विभाग

टॅग्स :Shivshahiशिवशाही