शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
3
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
4
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
5
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
6
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
7
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
9
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
10
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
11
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
12
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
13
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
14
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
15
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
16
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
17
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
18
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
19
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
20
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी १८ वर्षे समान वयाची अट अयोग्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 22:33 IST

लग्नासाठी वय महत्त्वाचे नसून सक्षमता महत्त्वाची आहे. ही मानसिक, शारीरिक सक्षमता येण्यासाठी १८ वर्षे ही समान वयाची अट संयुक्तिक नाही. त्याऐवजी २१ वर्षे केलेली एकदा मान्य करण्यासारखी राहील,

ठळक मुद्देचर्चासत्रातून उमटला सूर : भारतीय स्त्री शक्तीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नासाठी वय महत्त्वाचे नसून सक्षमता महत्त्वाची आहे. ही मानसिक, शारीरिक सक्षमता येण्यासाठी १८ वर्षे ही समान वयाची अट संयुक्तिक नाही. त्याऐवजी २१ वर्षे केलेली एकदा मान्य करण्यासारखी राहील, असा सूर भारतीय स्त्री शक्तीच्या नागपूर शाखेच्या व्यासपीठावरून व्यक्त झाला.लग्नाकरिता मुलामुलीचे वय सारखेच असावे, यासाठी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर महिला बाल विकास मंत्रालयाच्या वतीने स्टेक होल्डर्सकडून मते मागविली आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय स्त्री शक्ती नागपूर शाखेच्या वतीने मंगळवारी सायंकाळी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू धर्म संस्कृतीच्या कार्यालयात पार पडलेल्या या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी भारतीय स्त्री शक्तीच्या संघटनमंत्री डॉ. मनीषा कोठेकर होत्या. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर, लिंगशास्त्रतज्ज्ञ डॉ. संजय देशपांडे आणि कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. रेणुका शिरपूरकर यांनी मते व्यक्त केली.डॉ. संजय देशपांडे म्हणाले, १८ पेक्षा २१ वर्षाचे वय सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. दोघांनीही अर्थार्जन करावे, ही काळाची गरज आहे. त्यामुळे जबाबदार सामाजिक आणि वैवाहिक वर्तनासाठी काळजी घ्यायला हवी. मुले १८ वर्षांची होतपर्यंत वडिलांच्या पॉकेटमनीवर अवलंबून असतात. या वयात मुलांची लगे्न झाली तर न कमावणाऱ्या मुलांचा भार पालकांवरच पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दोघांचेही वय २१ पर्यंत मर्यादित केलेले अधिक उत्तम ठरू शकेल.डॉ. शेंबेकर म्हणाले, मुलींच्या मोनोपॉजचे वय ठरलेले असते. पुरुषांत मात्र अ‍ॅट्रोपॉजचे वय निश्चित नाही. अलीकडे ताणतणाव, बदललेली जीवनशैली, आहार यामुळे पुरुषांमध्ये अ‍ॅट्रोपॉजचे वय ४५ ते ५० व्या वर्षातच जाणवायला लागले आहे. अलीकडे मुली ९ ते ११ व्या वर्षी तर मुले १३ व्या वर्षात वयात येतात. हा पौगंडावस्थेचा काळ प्रजननासाठी अयोग्य वयाचा असतो. पुरुषाच्या शरीरापेक्षा स्त्रीचे प्रजनन अंग गुंतागुंतीचे असते. शारीरिक सक्षमतेसाठी १८ ते २१ पर्यंतचे वय मुलींच्या दृष्ष्टीने योग्य आहे. अलीकडे उशिरा लग्न-उशिरा मुलं अशी प्रवृत्ती समाजात मूळ धरत आहे. सामाजिकदृष्ट्या त्याचे दूरगामी परिणाम चांगले नसल्याने २१ व्या वर्षीच लग्न होणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.अ‍ॅड. शिरपूरकर म्हणाल्या, कायद्याचा उद्देश मानवी जीवन डोळ्यापुढे ठेवून केलेला आहे. बालविवाह प्रथा हा सामाजिक गुन्हा आहे. अलिकडे फार कमी प्रमाणात असे विवाह होतात. लग्नासाठी समानतेच्या नावाखाली १८ वर्षाचे वय करणे चुकीचे आहे. या वयातील लग्नानंतर संबंधविच्छेद झाले तर देशात मोठ्या प्रमाणावर सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतील. १८ वर्षांचा मुलगा पोटगीसाठी सक्षम असेल का, याचाही विचार व्हावा. लैंगिक शिक्षणामुळे निर्माण होणाऱ्या उत्सुकतेमधून विवाहबाह्य संबंधातून जन्मास आलेली मुले व त्यासाठी न्यायालयात चालणारे खटले हा सुद्धा उद्या सामाजिकदृष्ट्या चिंतेचा विषय ठरू शकतो. पालकांच्या दृष्टीनेही विचार करता दोघांचेही वय २१ असले तर सामजिकदृष्ट्या नाकारण्यासारखे राहणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. मनिषा कोठेकर यांनी विविध दाखले देत प्रारंभी या विषयाची मांडणी केली. भारत, पाश्चात्त्य राष्ट्रातील सामाजिक व्यवस्था त्यांनी सांगितली. चर्चासत्रानंतर प्रश्नोत्तरे झाली. कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :marriageलग्नWomenमहिला