शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रातील १८ युनिट ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:22 IST

वेस्टर्न कोलफिल्ड लि. (वेकोलि) मध्ये संप संपल्यानंतरही महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाची प्रचंड कमतरता आहे. यामुळे ऐन निवडणुकी दरम्यान राज्यात विजेचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड लि. (वेकोलि) मध्ये संप संपल्यानंतरही महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाची प्रचंड कमतरता आहे. यामुळे ऐन निवडणुकी दरम्यान राज्यात विजेचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की, राज्यातील क्षमता १०,८४२ मेगावॅट इतकी आहे. परंतु उत्पादन केवळ २८७८ मेगावॅट इतकेच होत आहे. महाजेनकोने कोळशाचा पुरवठा लवकरच वाढण्याचा दावा केला आहे तर महावितरणचे म्हणणे आहे की, पावसामुळे विजेची मागणी कमी आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय ग्रीड व खासगी वीज केंद्रांच्या भरवशावर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.कोळशाच्या कमतरतेमुळे सर्वाधिक फटका खापरखेडा वीज केंद्राला बसला आहे. येथील युनिट क्रमांक १, २, ४ चे उत्पादन यामुळेच बंद आहे. भुसावळ येथील युनिट क्रमांक १ व ५, चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ३, ५, ७, कोराडी ६,७,८, नाशिकमधील ३, पारस, परळी ६ व ८ सुद्धा बंद आहे. तशीही परळीतील युनिट क्रमांक ४ व ५ आर्थिक कारणांमुळे (महाग वीज) अगोदरच बंद आहे. त्याचप्रकारे पारस येथील युनिट क्रमांक ४ सुद्धा देखभाल दुरुस्तीसाठी बंद आहे. दुसरीकडे खासगी क्षेत्राची स्थितीही खूप चांगली नाही. अदानीची तिरोडा येथील युनिट कोळशाअभावी कमी उत्पादन करीत आहे. सध्या अदानीसह खासगी क्षेत्राकडून मिळत असलेले ४ हजार मेगावॅट, एनटीपीसीची ३३८१ मेगावॅट, कोयना जल विद्युतचे ११६७ मेगावॅटच्या भरवशावर राज्य लोडशेडिंमूक्त आहे.वीज वितरण कंपनी महावितरणने दावा केला आहे की, ते परिस्थितीवर नजर ठेवून आहे. लोडशेडिंग होऊ देणार नाही. कंपनीचे म्हणणे आहे की, राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे विजेची मागणी कमी झाली आहे. त्याामुळे पुरवठा करणे कठीण होणार नाही. मागणी वाढल्यास लाडे मॅनेजमेंटवर भर द्यावा लागेल. दुसरीकडे महाजेनकोचे म्हणणे आहे की, पावसामुळे ओल्या कोळशाचा पुरवठा होत आहे. यामुळे उत्पादन प्रभावित होत आहे.गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाले होते लोडशेडिंगकोळसा ओला होणे किंवा पुरवठा प्रभावित झाल्याने दरवर्षी सप्टेंबरमध्ये औष्णिक वीज केंद्रासमोर कोळशाचे संकट उभे राहते. प्रत्येक वर्षी हे संकट ओढवते. अनेक दाव्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. यामुळे गेल्या वर्षी ९ ऑक्टोबर रोजी मागणी व पुरवठ्याचे अंतर २५०० मेगावॅटपर्यंत पोहोचल्याने राज्याला लोडशेडिंगचा सामना करावा लागला होता. तसेच २०१७ मध्ये सुद्धा ऑक्टोबर महिन्यात कृषी पंपाच्या वीज पुरवठ्यात दोन तासाची कपात करावी लागली होती. यामुळे ही समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी ठोस पाऊल का उचलले जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :electricityवीज