शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रातील १८ युनिट ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:22 IST

वेस्टर्न कोलफिल्ड लि. (वेकोलि) मध्ये संप संपल्यानंतरही महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाची प्रचंड कमतरता आहे. यामुळे ऐन निवडणुकी दरम्यान राज्यात विजेचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड लि. (वेकोलि) मध्ये संप संपल्यानंतरही महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाची प्रचंड कमतरता आहे. यामुळे ऐन निवडणुकी दरम्यान राज्यात विजेचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की, राज्यातील क्षमता १०,८४२ मेगावॅट इतकी आहे. परंतु उत्पादन केवळ २८७८ मेगावॅट इतकेच होत आहे. महाजेनकोने कोळशाचा पुरवठा लवकरच वाढण्याचा दावा केला आहे तर महावितरणचे म्हणणे आहे की, पावसामुळे विजेची मागणी कमी आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय ग्रीड व खासगी वीज केंद्रांच्या भरवशावर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.कोळशाच्या कमतरतेमुळे सर्वाधिक फटका खापरखेडा वीज केंद्राला बसला आहे. येथील युनिट क्रमांक १, २, ४ चे उत्पादन यामुळेच बंद आहे. भुसावळ येथील युनिट क्रमांक १ व ५, चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ३, ५, ७, कोराडी ६,७,८, नाशिकमधील ३, पारस, परळी ६ व ८ सुद्धा बंद आहे. तशीही परळीतील युनिट क्रमांक ४ व ५ आर्थिक कारणांमुळे (महाग वीज) अगोदरच बंद आहे. त्याचप्रकारे पारस येथील युनिट क्रमांक ४ सुद्धा देखभाल दुरुस्तीसाठी बंद आहे. दुसरीकडे खासगी क्षेत्राची स्थितीही खूप चांगली नाही. अदानीची तिरोडा येथील युनिट कोळशाअभावी कमी उत्पादन करीत आहे. सध्या अदानीसह खासगी क्षेत्राकडून मिळत असलेले ४ हजार मेगावॅट, एनटीपीसीची ३३८१ मेगावॅट, कोयना जल विद्युतचे ११६७ मेगावॅटच्या भरवशावर राज्य लोडशेडिंमूक्त आहे.वीज वितरण कंपनी महावितरणने दावा केला आहे की, ते परिस्थितीवर नजर ठेवून आहे. लोडशेडिंग होऊ देणार नाही. कंपनीचे म्हणणे आहे की, राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे विजेची मागणी कमी झाली आहे. त्याामुळे पुरवठा करणे कठीण होणार नाही. मागणी वाढल्यास लाडे मॅनेजमेंटवर भर द्यावा लागेल. दुसरीकडे महाजेनकोचे म्हणणे आहे की, पावसामुळे ओल्या कोळशाचा पुरवठा होत आहे. यामुळे उत्पादन प्रभावित होत आहे.गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाले होते लोडशेडिंगकोळसा ओला होणे किंवा पुरवठा प्रभावित झाल्याने दरवर्षी सप्टेंबरमध्ये औष्णिक वीज केंद्रासमोर कोळशाचे संकट उभे राहते. प्रत्येक वर्षी हे संकट ओढवते. अनेक दाव्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. यामुळे गेल्या वर्षी ९ ऑक्टोबर रोजी मागणी व पुरवठ्याचे अंतर २५०० मेगावॅटपर्यंत पोहोचल्याने राज्याला लोडशेडिंगचा सामना करावा लागला होता. तसेच २०१७ मध्ये सुद्धा ऑक्टोबर महिन्यात कृषी पंपाच्या वीज पुरवठ्यात दोन तासाची कपात करावी लागली होती. यामुळे ही समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी ठोस पाऊल का उचलले जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :electricityवीज