शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

३८ महिन्यांत उपराजधानीतील १८,३३८ नागरिक बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 10:26 IST

उपराजधानीत नागरिक बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१५ सालापासून ३८ महिन्यांत शहरात १८ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या.

ठळक मुद्देदोन हजार जणांचा शोध नाहीचअल्पवयीन मुले, मुली, ज्येष्ठ नागरिकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत नागरिक बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१५ सालापासून ३८ महिन्यांत शहरात १८ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. यातील १६ हजारांहून अधिक जण सापडले असले तरी दोन हजार जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही. यात अल्पवयीन मुले, मुले व ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत पोलीस विभागाकडे बेपत्ता झालेल्या नागरिकांविषयी विचारणा केली होती.१ जानेवारी २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत किती नागरिक हरविले, किती जणांचा शोध लागला, यात मुले, मुली यांचा किती प्रमाणात समावेश होता, तसेच ‘आॅपरेशन मुस्कान’ला किती प्रमाणात यश मिळाले. इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत शहरात १८ हजार ३३८ नागरिक बेपत्ता झाले. यातील १६ हजार १७४ नागरिक सापडले. १०९ प्रकरणात बेपत्ता झालेले नागरिक मृत सापडले. परंतु २ हजार ५५ नागरिकांचा शोध लागलेला नाही. शहर पोलिसांनी बेपत्ता नागरिकांसाठी ‘सेल’ सुरू केल्यापासून १ हजार ६५ नागरिकांचा अद्यापही शोध लागलेला नाही. यात ५४ मुले, ८७ मुली यांचादेखील समावेश आहे. दरम्यान, या कालावधीत पोलिसांकडे ६७७ ज्येष्ठ नागरिक हरविल्याच्या तक्रारी आल्या.‘आॅपरेशन मुस्कान’मध्ये ६४ जणांचा शोधनागपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलामुलींचा शोध घेण्यासाठी ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविले होत. १ जानेवारी २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत २८ अल्पवयीन मुले तर ३६ अल्पवयीन मुलींना शोधण्यात यश आले.

टॅग्स :Crimeगुन्हा