शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

३८ महिन्यांत उपराजधानीतील १८,३३८ नागरिक बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 10:26 IST

उपराजधानीत नागरिक बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१५ सालापासून ३८ महिन्यांत शहरात १८ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या.

ठळक मुद्देदोन हजार जणांचा शोध नाहीचअल्पवयीन मुले, मुली, ज्येष्ठ नागरिकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत नागरिक बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१५ सालापासून ३८ महिन्यांत शहरात १८ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. यातील १६ हजारांहून अधिक जण सापडले असले तरी दोन हजार जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही. यात अल्पवयीन मुले, मुले व ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत पोलीस विभागाकडे बेपत्ता झालेल्या नागरिकांविषयी विचारणा केली होती.१ जानेवारी २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत किती नागरिक हरविले, किती जणांचा शोध लागला, यात मुले, मुली यांचा किती प्रमाणात समावेश होता, तसेच ‘आॅपरेशन मुस्कान’ला किती प्रमाणात यश मिळाले. इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत शहरात १८ हजार ३३८ नागरिक बेपत्ता झाले. यातील १६ हजार १७४ नागरिक सापडले. १०९ प्रकरणात बेपत्ता झालेले नागरिक मृत सापडले. परंतु २ हजार ५५ नागरिकांचा शोध लागलेला नाही. शहर पोलिसांनी बेपत्ता नागरिकांसाठी ‘सेल’ सुरू केल्यापासून १ हजार ६५ नागरिकांचा अद्यापही शोध लागलेला नाही. यात ५४ मुले, ८७ मुली यांचादेखील समावेश आहे. दरम्यान, या कालावधीत पोलिसांकडे ६७७ ज्येष्ठ नागरिक हरविल्याच्या तक्रारी आल्या.‘आॅपरेशन मुस्कान’मध्ये ६४ जणांचा शोधनागपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलामुलींचा शोध घेण्यासाठी ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविले होत. १ जानेवारी २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत २८ अल्पवयीन मुले तर ३६ अल्पवयीन मुलींना शोधण्यात यश आले.

टॅग्स :Crimeगुन्हा