शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

कोरोना टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्यात १,७३२ स्वच्छाग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 01:15 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात अद्याप रुग्ण नाही. मात्र भविष्यात विदारक स्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने युनिसेफच्या सहकार्याने जिल्ह्यात १,७३२ स्वच्छाग्रही नेमण्यात आले आहेत.

ठळक मुद्देदिले ऑनलाईन प्रशिक्षण : ग्रामस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करणार मार्गदर्शन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात अद्याप रुग्ण नाही. मात्र भविष्यात विदारक स्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने युनिसेफच्या सहकार्याने जिल्ह्यात १,७३२ स्वच्छाग्रही नेमण्यात आले आहेत. या स्वच्छाग्रहींना विशेष ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरणाची परिस्थिती निर्माण करणे, कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये यासाठी जाणीव-जागृती करण्यास मदत मिळेल.ग्रामपंचायतीमधील स्वच्छाग्रहींना ऑनलाईनच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावस्तरावर अपेक्षित असलेल्या स्वच्छताविषयक उपक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील १,७३२ स्वच्छाग्रहींनी प्रशिक्षणात आपला सहभाग नोंदवून येणाऱ्या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत कोविड-१९ आणि स्वच्छतेच्या संदर्भाने प्रबोधन करणार आहे. जिल्ह्यात ७६९ ग्रामपंचायतींमध्ये पाणी व स्वच्छताविषयक काम करण्यासाठी १९७५ स्वच्छाग्रही कार्यरत आहते. या प्रशिक्षणात कोरोना आजाराची संकल्पना, हातांची स्वच्छता, श्वसन संस्थेची स्वच्छता, शारीरिक अंतर राखणे, अधिक जोखमीचे गट, घ्यावयाची काळजी, रोग प्रसाराचे मार्ग, मास्कचे प्रकार व उपयोग, मास्कची हाताळणी, गावस्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींनी घ्यावयाची खबरदारी, वयोवृद्ध व्यक्ती, हृदयविकार, मधुमेह, फुफ्फु साचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, गर्भवती महिला, लहान मुले, सार्वजनिक स्वच्छता यामध्ये पाणी, साबण, स्वच्छता, शौचालयाचा वापर, मैला गाळ व्यवस्थापन, सर्वांसाठी सामाजिक अंतर, कोविड- संभाव्यबाधित व्यक्तीसंबंधी घ्यावयाची काळजी, विलगीकरण म्हणजे काय, घरातील उपचार, आजाराचे समज-गैरसमज, मानहानी व भेदभाव याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यात आले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानnagpurनागपूर