शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साडेसोळा हजारावर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 21:24 IST

दीर्घकाळ वीज बिलाची थकबाकी असलेल्या आणि वारंवार सूचित करूनही ती न भरणाऱ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील ११ जिल्हे मिळून एकट्या फेब्रुवारी महिन्यात तब्बल १६ हजार ५८९ घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यापैकी काहींचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे.

ठळक मुद्देथकबाकी वसुलीसाठी महावितरणचा धडाका : अकराही जिल्ह्यांमध्ये मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीर्घकाळ वीज बिलाची थकबाकी असलेल्या आणि वारंवार सूचित करूनही ती न भरणाऱ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील ११ जिल्हे मिळून एकट्या फेब्रुवारी महिन्यात तब्बल १६ हजार ५८९ घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यापैकी काहींचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे.वीज बिलांची थकबाकी असणाऱ्यांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई महावितरणकडून सातत्याने करण्यात येते. मात्र सध्या आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असल्याने आणि अनेक महिने वीज बिल न भरलेल्या ग्राहकांची संख्या वाढल्याने महावितरणकडून वसुलीचा धडाका सुरू करण्यात आला आहे. वीज ग्राहकांकडे महावितरणच्या मासिक बिलाचा एक रुपयाही थकीत राहणार नाही, या ध्येयाने या मोहिमेमध्ये सर्वच अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत तर थकबाकीचा भरणा न झाल्यास कोणत्याही स्थितीत थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातील महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील एकूण १ लाख ७६ हजार ९७९ वीज ग्राहकांकडे एकूण ७० कोटी ३१ लाखाची थकबाकी होती, त्यापैकी या विशेष शून्य थकबाकी मोहिमेत १ लाख १ हजार २०९ ग्राहकांकडून २२ कोटी ९१ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे तर १० हजार ४९८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात आणि ६ हजार ९१ थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. यापैकी तब्बल ५ हजार ३४९ ग्राहकांचा वीजपुरवठा मागील आठवड्याभरात खंडित करण्यात आला. यात सर्वाधिक अकोला परिमंडळातील ७ हजार १४८ ग्राहकांचा समावेश असून त्याखालोखाल अमरावतीतील ५,१३७ ग्राहकांचा समावेश आहे, याशिवाय नागपूर परिमंडळातील २,००६, चंद्रपूर परिमंडळातील १, ६४३ तर गोंदियातील ६५५ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यापैकी ३५९३ ग्राहकांनी रीतसर पुनर्जोडणी शुल्क आणि थकबाकीचा भरणा केल्याने त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत जोडण्यात आला आहे. तत्पूर्वी जानेवारी महिन्यातही नागपूर परिक्षेत्रातील तब्बल १६ हजार ७६२ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही अनधिकृतपणे वीज वापर केल्यास थेट फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे

टॅग्स :mahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन