शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१६४ गावांना पुराचा धोका!

By admin | Updated: May 28, 2014 01:08 IST

नागपूर जिल्ह्यातील १६४ गावे आणि शहरातील १३ वॉर्डात संभाव्य पुराचा धोका असून, त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी संबंधित विभाग व तालुका पातळीवर तहसीलदारांनी तत्काळ

१३ वॉर्डांनाही अडचण : १ जूनपासून नियंत्रण कक्ष सुरू

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १६४ गावे आणि शहरातील १३ वॉर्डात संभाव्य पुराचा धोका असून, त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी संबंधित विभाग व तालुका पातळीवर तहसीलदारांनी तत्काळ आराखडा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिले. अमरावती मार्गावरील मृद सर्वेक्षण विभागाच्या सभागृहात मंगळवारी पूर प्रतिबंधक उपाययोजनांबाबत विविध विभागाने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा होते. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन उपस्थित होते. यात १ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी आणि आपत्ती आल्यावर काय उपाययोजना करायच्या, या संदर्भातील सूक्ष्म आराखडा संबंधित विभागाने तयार करावा, जिल्ह्यातील ज्या गाावांना पुराचा धोका संभवतो अशा ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या. नदीकाठच्या गावांतील नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आल्यास पर्यायी निवास व्यवस्था करावी, पुरामुळे गावांचा इतर भागाशी संपर्क तुटल्यास तेथे जीवनावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध करून द्यावा, रोगाची साथ पसरू नये म्हणून दक्षता घ्यावी, स्वच्छ पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी, दूरध्वनीसेवा खंडित झाल्यास बीएसएनएलने तातडीने उपाययोजना करावी, तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणने त्याबाबत तातडीने दखल घेऊन तो पूर्ववत करावा, अशा सूचना कृष्णा यांनी संबंधित विभागांना दिल्या. तालुका पातळीवरील पूर प्रतिबंधक उपाययोजनांचा आराखडा तत्काळ तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. हवामान खात्याने अतिवृष्टीबाबत पूर्वसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाला द्यावी, गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवरील आपात्कालीन व्यवस्थापन समित्या अद्ययावत कराव्या, पूर परिस्थिती निर्माण झाल्यास पोहणार्‍या व नाविकांची गरज भासू शकते; अशा वेळी त्यांच्या नावाची यादी त्यांच्या दूरध्वनी क्रमांकासह सज्ज ठेवावी, असेही कृष्णा यांनी सांगितले. सुरुवातीला प्रवीण महाजन यांनी बैठकीच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. पंजाबराव वानखडे यांनी बैठकीला उपस्थित विविध विभागांतील प्रतिनिधींकडून पूर नियंत्रणाबाबत काय तयारी केली, याचा आढावा घेतला. बैठकीच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा सहभागी झाले. पूर परिस्थितीच्या काळात विविध विभागात समन्वयाचा अभाव असतो, काही ठिकाणी यंत्रणेकडून तत्काळ प्रतिसाद मिळतो तर काही ठिकाणी त्याला विलंब लागतो. या परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद महत्त्वाचा असतो. त्यामुळे विविध विभागांनी परस्परांशी समन्वय कायम ठेवून गरजेच्या वेळी जलद प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करावा, असे बैठकीत सांगण्यात आले. पूर नियंत्रण यंत्रणेत सहभागी असणार्‍या अधिकार्‍यांनी त्यांचे दूरध्वनी बंद ठेवू नयेत, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आपात्कालीन काळात मोबाईल बंद पडण्याच्याही घटना घडतात. अशा वेळी कर्मचार्‍यांनी सीडीएमएचे फोन वापरावे, ते उपलब्ध करून देण्यास सहकार्य करण्याची तयारी बीएसएनएलच्या अधिकार्‍यांनी यावेळी दर्शविली. बैठकीला बीएसएनएल, महावितरण, हवामान, पोलीस, गृहरक्षक दल, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन, महापालिका, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पाणी पुरवठा, रेल्वे, वायू दल, सैन्य दल, आकाशवाणी आणि महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)