शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

१६ स्कूल बसेस जप्त

By admin | Updated: June 25, 2014 01:26 IST

उन्हाळी सुट्यांमध्ये स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमध्ये नियमांची पूर्तता करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) केले होते. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन बहुसंख्य

२७ बसेसला नोटीस : कशी होणार विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक? नागपूर : उन्हाळी सुट्यांमध्ये स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमध्ये नियमांची पूर्तता करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) केले होते. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन बहुसंख्य शाळा गंभीर नसल्याचे शहरातील चित्र आहे. आरटीओ, शहरने सोमवारपासून सुरू केलेल्या तपासणीच्या आज दुसऱ्या दिवशी ४३ स्कूल बसेस दोषी आढळून आल्या. यातील १६ बसेस जप्त तर २७ बसेसना नोटीस बजावून सोडून देण्यात आले. आरटीओ, शहरकडून मागील शैक्षणिक वर्षात साधारण पाच-सहा वेळा स्कूल बस तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळीही शेकडो बसेसवर कारवाई झाली. त्यानंतरही विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला घेऊन शाळा प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते. तीन पथकाच्या मदतीने सकाळी ६.३० ते ९.३० दरम्यान ७० स्कूल बस व व्हॅनची तपासणी करण्यात आली. यात दोषी आढळलेल्या ४३ वाहनांमध्ये तुटलेले स्पीड गव्हर्नर, अग्निशमन यंत्राचा अभाव, नादुरुस्त डोअर बेल, इमर्जन्सी विंडो आणि फिटनेसचे प्रमाणपत्र नसलेल्या त्रुटी आढळून आल्या. यातील १२ स्कूल बसेस तर पाच व्हॅन जप्त करण्यात आल्या. २७ वाहनांना नोटीस बजावण्यात आल्या असून त्यांना आठवड्याभरात नियमांची पूर्तता करायची आहे. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विजय चव्हाण आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात झाली.आरटीओ फुल्लतब्बल १६ स्कूल बस आणि व्हॅनवर जप्तीची कारवाई केल्याने शहर आरटीओ कार्यालय आज फुल्ल झाले होते. वाहन उभे करायला कुठेच जागा नव्हती. यामुळे ट्रायल आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी येणाऱ्या वाहनांना अडचणीचे गेले. बेशिस्त पार्किंगवरही आरटीओने कारवाई केली. पालकांची दमछाकसकाळच्या पाळीतील विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या व सोडून देत असलेल्या स्कूल बसेसवर जप्ती कारवाई झाल्याने काही कंत्राटदारांनी आपल्या बसेस शाळेत उभ्या केल्या.यामुळे विद्यार्थ्यांना परत घरी सोडण्यासाठी बसेस कमी पडल्या. अनेक शाळा प्रशासनाने पालकांना फोनद्वारे कारवाईची माहिती देत, विद्यार्थ्यांना शाळेतून घेऊन जाण्यास सांगितले. यात पालकांची चांगलीच दमछाक झाली. (प्रतिनिधी)