शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

वीज बिल माफीमुळे १५,८७० कोटींचा बोजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 17:13 IST

Nagpur : शेतकरी, महावितरणला फायदा; पण, वसुली नक्की होणार कुठून?

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात ७.५ एचपी क्षमतेच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा राज्यातील ४४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. मात्र, गेल्या वर्षी या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या वीज बिलांवर नजर टाकल्यास या निर्णयामुळे राज्य सरकारवर १५ हजार ८७० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या योजनेची अधिसूचना निघाल्यानंतरच हा खर्च कोठून वसूल होणार हे स्पष्ट होणार आहे. 

राज्य सरकारच्या या योजनेचा शेतकऱ्यांसोबतच महावितरणलाही फायदा होणार आहे. २३-२४ या आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाले तर कृषी पंप जोडणीसाठी एकूण १५ हजार ८७० कोटी रुपये दिले जातील. याबाबतचे विधेयक पारित करण्यात आले आहे. राज्य सरकारने ६ हजार ६३७ कोटी रुपये अनुदान म्हणून दिले आहेत. तर शेतकऱ्यांनी दिलेल्या बिलांचा समावेश करून महावितरणला ६,९२९ कोटी रुपये मिळाले. परंतु, ८ हजार ९४१ कोटी रुपये बिल थकीत होते. आता राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यामुळे संपूर्ण रक्कम महावितरणला मिळेल, असा विश्वास आहे. मात्र, यासंदर्भात अधिसूचना जारी झाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.

या योजनेवर महावितरणचे अधिकारी सध्या काहीही बोलणे टाळत आहेत. अधिसूचना निघाल्यानंतरच यात स्पष्टता येईल. दुसरीकडे राज्य सरकार या निधीचे व्यवस्थापन कुठे करणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार, वीजदरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलवरही सेस लावला जाऊ शकतो, असेही बोलले जात आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीजGovernmentसरकार