शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

वीज बिल माफीमुळे १५,८७० कोटींचा बोजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 17:13 IST

Nagpur : शेतकरी, महावितरणला फायदा; पण, वसुली नक्की होणार कुठून?

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात ७.५ एचपी क्षमतेच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा राज्यातील ४४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. मात्र, गेल्या वर्षी या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या वीज बिलांवर नजर टाकल्यास या निर्णयामुळे राज्य सरकारवर १५ हजार ८७० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या योजनेची अधिसूचना निघाल्यानंतरच हा खर्च कोठून वसूल होणार हे स्पष्ट होणार आहे. 

राज्य सरकारच्या या योजनेचा शेतकऱ्यांसोबतच महावितरणलाही फायदा होणार आहे. २३-२४ या आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाले तर कृषी पंप जोडणीसाठी एकूण १५ हजार ८७० कोटी रुपये दिले जातील. याबाबतचे विधेयक पारित करण्यात आले आहे. राज्य सरकारने ६ हजार ६३७ कोटी रुपये अनुदान म्हणून दिले आहेत. तर शेतकऱ्यांनी दिलेल्या बिलांचा समावेश करून महावितरणला ६,९२९ कोटी रुपये मिळाले. परंतु, ८ हजार ९४१ कोटी रुपये बिल थकीत होते. आता राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यामुळे संपूर्ण रक्कम महावितरणला मिळेल, असा विश्वास आहे. मात्र, यासंदर्भात अधिसूचना जारी झाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.

या योजनेवर महावितरणचे अधिकारी सध्या काहीही बोलणे टाळत आहेत. अधिसूचना निघाल्यानंतरच यात स्पष्टता येईल. दुसरीकडे राज्य सरकार या निधीचे व्यवस्थापन कुठे करणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार, वीजदरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलवरही सेस लावला जाऊ शकतो, असेही बोलले जात आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीजGovernmentसरकार