शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

आईवडिलांच्या वादाला वैतागले; दोन अल्पवयीनांनी जीवन संपविले; समाजमन हादरले

By योगेश पांडे | Updated: May 9, 2023 21:51 IST

Nagpur News आईवडिलांच्या वादातून तणावात आल्यामुळे २४ तासांत दोन अल्पवयीनांनी राहत्या घरीच गळफास घेत आत्महत्या केली.

योगेश पांडेनागपूर : लहान मुलांसमोर आईवडिलांनी वाद टाळले पाहिजे, असे तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले जात असले तरी त्याकडे समाजात सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. याचा परिणाम लहान मुलांच्या मानसिकतेवर होतो. आईवडिलांच्या वादातून तणावात आल्यामुळे २४ तासांत दोन अल्पवयीनांनी राहत्या घरीच गळफास घेत आत्महत्या केली. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी परिसरात अवघ्या १५ वर्षीय मुलाने गळफास घेत जीव दिला, तर अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्षीय मुलीने आयुष्य संपविले. या दोन्ही आत्महत्यांचे कारण ऐकून पोलिसांनादेखील धक्काच बसला.

विनय अमित मसराम (१५, पांढराबोडी) असे मृत मुलाचे नाव आहे. विनय हा नववीत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मोठ्या बहिणीने मागील वर्षी आत्महत्या केली होती. त्यानंतर तो बराच अबोल झाला होता. त्यातच त्याच्या आईवडिलांचा सतत विविध कारणांवरून वाद व्हायचा. विनय यामुळे मनातून अस्वस्थ होता. १५ दिवसांअगोदर त्याच्या आईवडिलांचे परत मोठे भांडण झाले व त्याची आई माहेरी निघून गेली. यानंतर विनयच्या मनावरील ताण आणखी वाढला होता. सोमवारी दुपारच्या सुमारास त्याचे वडील पेंटिंगच्या कामावर गेले होते. घरी कुणीच नसताना विनयने लाकडी बल्लीला चादरीच्या साहाय्याने गळफास घेतला. वडील सायंकाळी पावणेसात वाजता घरी आले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. वडिलांनी दिलेल्या सूचनेवरून अंबाझरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वर्षभरातच मसराम दाम्पत्याने मुलगी व मुलगा गमावले असून, या घटनेमुळे त्याच्या आई-वडिलांना धक्का बसला आहे. शिवाय परिसरातील नागरिकांमध्येही दु:खाचे वातावरण आहे.

बाहेरगावावरून वडील आले अन् मुलीने जीव दिला

अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नंदिनी सयाजी गोरे (१६, द्वारकापुरी गल्ली क्रमांक दोन) या मुलीने आत्महत्या केली. तिचे वडील बाहेरगावी नोकरी करतात. ते नागपूरला आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा घरगुती कारणावरून पत्नीशी वाद झाला. यामुळे नंदिनी तणावात आली व तिने आईला वाद न घालण्यास सांगितले. यातून आईने तिला रागावले. अगोदरच तणावात असलेली नंदिनी प्रचंड संतापली व तिने बेडरूममध्ये जाऊन सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडला असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. सयाजी गोरे यांच्या सूचनेवरून अजनी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या या पावलामुळे घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.

मुलांसमोर वाद नकोच

दैनंदिन जीवनात लहानसहान कारणांवरून पती-पत्नी मुलांसमोर वाद घालताना दिसून येतात. यामुळे मुलांच्या मनावर नकळतपणे नकारात्मक परिणाम होत असतो. यातूनच त्यांच्यामध्ये लहान वयातच तणाव वाढायला लागतो. त्याचीच परिणिती टोकाचे पाऊल उचलण्यात होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांसमोर वाद टाळलेच पाहिजे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Deathमृत्यू