शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

उपराजधानीत मिरगीचे १५ हजार बालरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:42 IST

एका अभ्यासानुसार नागपुरात या आजाराचे ३२ हजार रुग्ण आहेत. यात १५ हजार हे बालरुग्ण आहेत.

ठळक मुद्देगर्भावस्थेतही अपस्मारवर औषधोपचार सामान्य प्रसूती, स्तनपान सहज शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिरगी म्हणजे अपस्मार, हा मेंदूचा आजार आहे. मेंदूमध्ये अचानक व जास्त प्रमाणात तयार होणाऱ्या विद्युतप्रवाहामुळे हा आजार होतो. जगात याचे पाच कोटी रुग्ण आहेत. एका अभ्यासानुसार नागपुरात या आजाराचे ३२ हजार रुग्ण आहेत. यात १५ हजार हे बालरुग्ण आहेत. या आजाराला औषध आहे आणि काही प्रमाणात तो टाळताही येऊ शकतो. विशेषत: गर्भावस्थेतही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेता येतात, यामुळे मिरगीला घाबरू नका, लपवू नका असे आवाहन डॉक्टरांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेतून केले आहे. यावेळी मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. नीरज बाहेती, बालरोग तज्ज्ञ डॉ. विनीत वानखेडे व डॉ. जे. करणकुमार उपस्थित होते.डॉ. बाहेती म्हणाले, मिरगीचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही छोटे तर काही मोठे, काही शरीराच्या एका भागात तर काही पूर्ण शरीरात होतात. काहीमध्ये शुद्ध हरपते, तर काहीमध्ये फक्त दचकल्यासारखं होते. मिरगी आजार होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. मेंदूतील अंतर्गत भागांना झालेली दुखापत, मेंदूतील गाठी, मेंदूतील अंतर्गत झटके, डोक्याला अपघातामुळे झालेली इजा किंवा जन्मत:च एखाद्या बाळाच्या मेंदूत असणारा दोष यामुळे असे झटके येतात.‘नॉर्मल डिलिव्हरी’साठी प्रयत्न व्हायला हवेतप्रसूत माता मिरगीची रुग्ण असलीतरी तिच्याकडून ‘नॉर्मल डिलिव्हरी’साठी प्रयत्न व्हायला हवेत, असे आवाहन डॉ. बाहेती यांनी केले. ते म्हणाले, अशा रुग्णांकडून नॉर्मल प्रसूती झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, प्रसूतीनंतर अशा माता स्तनपान करू शकतात. आजाराचा कुठलाही प्रभाव जन्मजात बाळावर होत नाही.गर्भावस्थेत मिरगीच्या औषधाकडे दुर्लक्ष करणे धोकादायकडॉ. बाहेती म्हणाले, साधारण दोन ते पाच टक्के गर्भवतींना मिरगीचा आजार दिसून येतो. या आजाराला घेऊन अनेक गैरसमज आहेत. यामुळे गर्भावस्थेच्या दरम्यान अनेक महिला औषधे घेणे बंद करतात. परिणामी, गंभीर स्वरूपाचा धोका होण्याची शक्यता १० टक्क्यांनी वाढते. शिवाय, कमी दिवसांचे बाळ जन्माला येण्याची, रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होत नाही. गर्भावस्थेतही औषधे घेतल्यास ९५ टक्के बालके सुदृढ जन्माला येतात.-तर ७५ टक्के मुलांना भविष्यात औषधांची गरज पडत नाहीडॉ. विनीत वानखेडे म्हणाले, अपस्माराचे प्रमाण प्रौढ व्यक्तींमध्ये जास्त दिसत असले तरी बहुतांशवेळी त्याची सुरुवात १२ वर्षाच्या आत होते. मुलांचे योग्य वेळेत निदान झाल्यास उपचाराने ७० ते ७५ टक्के मुलांना भविष्यात औषधांची गरज पडत नाही. केवळ पाच टक्के मुलांमध्ये अपस्मारासाठी आयुष्यभर औषधोपचार करावा लागतो. मिरगीचे रुग्णही नॉर्मल जीवन जगू शकतात. सर्व खेळांमध्ये सहभागी होऊ शकतात, शिक्षणातही प्रगती करू शकतात.

टॅग्स :Healthआरोग्य