शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

उपराजधानीत मिरगीचे १५ हजार बालरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:42 IST

एका अभ्यासानुसार नागपुरात या आजाराचे ३२ हजार रुग्ण आहेत. यात १५ हजार हे बालरुग्ण आहेत.

ठळक मुद्देगर्भावस्थेतही अपस्मारवर औषधोपचार सामान्य प्रसूती, स्तनपान सहज शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिरगी म्हणजे अपस्मार, हा मेंदूचा आजार आहे. मेंदूमध्ये अचानक व जास्त प्रमाणात तयार होणाऱ्या विद्युतप्रवाहामुळे हा आजार होतो. जगात याचे पाच कोटी रुग्ण आहेत. एका अभ्यासानुसार नागपुरात या आजाराचे ३२ हजार रुग्ण आहेत. यात १५ हजार हे बालरुग्ण आहेत. या आजाराला औषध आहे आणि काही प्रमाणात तो टाळताही येऊ शकतो. विशेषत: गर्भावस्थेतही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेता येतात, यामुळे मिरगीला घाबरू नका, लपवू नका असे आवाहन डॉक्टरांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेतून केले आहे. यावेळी मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. नीरज बाहेती, बालरोग तज्ज्ञ डॉ. विनीत वानखेडे व डॉ. जे. करणकुमार उपस्थित होते.डॉ. बाहेती म्हणाले, मिरगीचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही छोटे तर काही मोठे, काही शरीराच्या एका भागात तर काही पूर्ण शरीरात होतात. काहीमध्ये शुद्ध हरपते, तर काहीमध्ये फक्त दचकल्यासारखं होते. मिरगी आजार होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. मेंदूतील अंतर्गत भागांना झालेली दुखापत, मेंदूतील गाठी, मेंदूतील अंतर्गत झटके, डोक्याला अपघातामुळे झालेली इजा किंवा जन्मत:च एखाद्या बाळाच्या मेंदूत असणारा दोष यामुळे असे झटके येतात.‘नॉर्मल डिलिव्हरी’साठी प्रयत्न व्हायला हवेतप्रसूत माता मिरगीची रुग्ण असलीतरी तिच्याकडून ‘नॉर्मल डिलिव्हरी’साठी प्रयत्न व्हायला हवेत, असे आवाहन डॉ. बाहेती यांनी केले. ते म्हणाले, अशा रुग्णांकडून नॉर्मल प्रसूती झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, प्रसूतीनंतर अशा माता स्तनपान करू शकतात. आजाराचा कुठलाही प्रभाव जन्मजात बाळावर होत नाही.गर्भावस्थेत मिरगीच्या औषधाकडे दुर्लक्ष करणे धोकादायकडॉ. बाहेती म्हणाले, साधारण दोन ते पाच टक्के गर्भवतींना मिरगीचा आजार दिसून येतो. या आजाराला घेऊन अनेक गैरसमज आहेत. यामुळे गर्भावस्थेच्या दरम्यान अनेक महिला औषधे घेणे बंद करतात. परिणामी, गंभीर स्वरूपाचा धोका होण्याची शक्यता १० टक्क्यांनी वाढते. शिवाय, कमी दिवसांचे बाळ जन्माला येण्याची, रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होत नाही. गर्भावस्थेतही औषधे घेतल्यास ९५ टक्के बालके सुदृढ जन्माला येतात.-तर ७५ टक्के मुलांना भविष्यात औषधांची गरज पडत नाहीडॉ. विनीत वानखेडे म्हणाले, अपस्माराचे प्रमाण प्रौढ व्यक्तींमध्ये जास्त दिसत असले तरी बहुतांशवेळी त्याची सुरुवात १२ वर्षाच्या आत होते. मुलांचे योग्य वेळेत निदान झाल्यास उपचाराने ७० ते ७५ टक्के मुलांना भविष्यात औषधांची गरज पडत नाही. केवळ पाच टक्के मुलांमध्ये अपस्मारासाठी आयुष्यभर औषधोपचार करावा लागतो. मिरगीचे रुग्णही नॉर्मल जीवन जगू शकतात. सर्व खेळांमध्ये सहभागी होऊ शकतात, शिक्षणातही प्रगती करू शकतात.

टॅग्स :Healthआरोग्य