शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत मिरगीचे १५ हजार बालरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:42 IST

एका अभ्यासानुसार नागपुरात या आजाराचे ३२ हजार रुग्ण आहेत. यात १५ हजार हे बालरुग्ण आहेत.

ठळक मुद्देगर्भावस्थेतही अपस्मारवर औषधोपचार सामान्य प्रसूती, स्तनपान सहज शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिरगी म्हणजे अपस्मार, हा मेंदूचा आजार आहे. मेंदूमध्ये अचानक व जास्त प्रमाणात तयार होणाऱ्या विद्युतप्रवाहामुळे हा आजार होतो. जगात याचे पाच कोटी रुग्ण आहेत. एका अभ्यासानुसार नागपुरात या आजाराचे ३२ हजार रुग्ण आहेत. यात १५ हजार हे बालरुग्ण आहेत. या आजाराला औषध आहे आणि काही प्रमाणात तो टाळताही येऊ शकतो. विशेषत: गर्भावस्थेतही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेता येतात, यामुळे मिरगीला घाबरू नका, लपवू नका असे आवाहन डॉक्टरांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेतून केले आहे. यावेळी मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. नीरज बाहेती, बालरोग तज्ज्ञ डॉ. विनीत वानखेडे व डॉ. जे. करणकुमार उपस्थित होते.डॉ. बाहेती म्हणाले, मिरगीचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही छोटे तर काही मोठे, काही शरीराच्या एका भागात तर काही पूर्ण शरीरात होतात. काहीमध्ये शुद्ध हरपते, तर काहीमध्ये फक्त दचकल्यासारखं होते. मिरगी आजार होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. मेंदूतील अंतर्गत भागांना झालेली दुखापत, मेंदूतील गाठी, मेंदूतील अंतर्गत झटके, डोक्याला अपघातामुळे झालेली इजा किंवा जन्मत:च एखाद्या बाळाच्या मेंदूत असणारा दोष यामुळे असे झटके येतात.‘नॉर्मल डिलिव्हरी’साठी प्रयत्न व्हायला हवेतप्रसूत माता मिरगीची रुग्ण असलीतरी तिच्याकडून ‘नॉर्मल डिलिव्हरी’साठी प्रयत्न व्हायला हवेत, असे आवाहन डॉ. बाहेती यांनी केले. ते म्हणाले, अशा रुग्णांकडून नॉर्मल प्रसूती झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, प्रसूतीनंतर अशा माता स्तनपान करू शकतात. आजाराचा कुठलाही प्रभाव जन्मजात बाळावर होत नाही.गर्भावस्थेत मिरगीच्या औषधाकडे दुर्लक्ष करणे धोकादायकडॉ. बाहेती म्हणाले, साधारण दोन ते पाच टक्के गर्भवतींना मिरगीचा आजार दिसून येतो. या आजाराला घेऊन अनेक गैरसमज आहेत. यामुळे गर्भावस्थेच्या दरम्यान अनेक महिला औषधे घेणे बंद करतात. परिणामी, गंभीर स्वरूपाचा धोका होण्याची शक्यता १० टक्क्यांनी वाढते. शिवाय, कमी दिवसांचे बाळ जन्माला येण्याची, रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होत नाही. गर्भावस्थेतही औषधे घेतल्यास ९५ टक्के बालके सुदृढ जन्माला येतात.-तर ७५ टक्के मुलांना भविष्यात औषधांची गरज पडत नाहीडॉ. विनीत वानखेडे म्हणाले, अपस्माराचे प्रमाण प्रौढ व्यक्तींमध्ये जास्त दिसत असले तरी बहुतांशवेळी त्याची सुरुवात १२ वर्षाच्या आत होते. मुलांचे योग्य वेळेत निदान झाल्यास उपचाराने ७० ते ७५ टक्के मुलांना भविष्यात औषधांची गरज पडत नाही. केवळ पाच टक्के मुलांमध्ये अपस्मारासाठी आयुष्यभर औषधोपचार करावा लागतो. मिरगीचे रुग्णही नॉर्मल जीवन जगू शकतात. सर्व खेळांमध्ये सहभागी होऊ शकतात, शिक्षणातही प्रगती करू शकतात.

टॅग्स :Healthआरोग्य