शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

१५ टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 19:42 IST

: कापूस खरेदी योजनेंतर्गत कापूस पणन महासंघ व सीसीआयमार्फत नागपूर जिल्ह्यातून १८ लाख ६४ हजार १८९ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. पण नागपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन अंदाजे ३०.७६ लाख क्विंटल झाले आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या घरात १५ टक्के कापूस शिल्लक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कापूस खरेदी योजनेंतर्गत कापूस पणन महासंघ व सीसीआयमार्फत नागपूर जिल्ह्यातून १८ लाख ६४ हजार १८९ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. पण नागपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन अंदाजे ३०.७६ लाख क्विंटल झाले आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या घरात १५ टक्के कापूस शिल्लक आहे. पावसामुळे खरेदी केंद्र बंद झाली आहे. कापसाच्या ग्रेडिंगवर परिणाम झाला आहे. खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडले आहेत. त्यामुळे अजूनही घरात कापूस ठेवलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ८९ हजार ९२४ शेतकऱ्यांकडून सरकारने कापसाची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील दहा तालुक्यात कापूस पणन महासंघ व सीसीआयमार्फत जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कापसाची खरेदी करण्यात आली. कापूस पणन महासंघाने जिल्ह्यात ६ लाख ६५ हजार क्विंटल खरेदी केली. उर्वरित खरेदी सीसीआयमार्फत करण्यात आली. पाऊस सुरू झाल्याने सध्या सरकारी खरेदी बंद करण्यात आली आहे. सरकारने यंदा कापसाला ५५५० रुपये हमीभाव दिला होता. पण यावर्षी खरेदी उशिरा सुरू झाली आणि केंद्रही अपुरे सुरू केले होते. त्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांचा कापूस विकल्या गेला नाही. आतातर पाऊस सुरू झाल्याने शिल्लक कापूस सरकार खरेदी करणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सरकारी खरेदी केंद्र बंद झाल्याने व्यापाऱ्यांनीही कापसाचे भाव पाडले आहेत. २९०० रुपयांपासून ४४०० रुपयांपर्यंत व्यापारी कापसाला भाव देत आहेत. शेतकऱ्यांजवळ साठवणुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने मिळेल त्या भावात आता शेतकरी कापसाची विक्री करीत असल्याची परिस्थिती आहे.कापूस न विकल्यामुळे कर्जही मिळत नाहीहिंगणा तालुक्यातील शेतकरी नारायण बुंदे म्हणाले, माझ्याकडे ४ एकर शेती आहे. यंदा ४० क्विंटल कापूस झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २९ एप्रिलला नोंदणी केली. परंतु अजूनही कापूस विकल्या गेला नाही. त्यामुळे बँकेकडून घेतलेले पीक कर्ज अजूनही भरले नाही. बँकेकडे चौकशी केली असता, जुने कर्ज भरा, नंतर नवीन कर्ज मिळेल असे सांगण्यात आले. त्यामुळे शेती करताना आता अडचण निर्माण झाली आहे.लवकरात लवकर खरेदी करावीशिल्लक कापूस खरेदी करण्याची हमी सरकारने घेतली आहे. पण आता पावसाचा परिणाम कापसाच्या ग्रेडिंगवर होणार आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर खरेदी करून, शेतकऱ्यांना हमीभावाप्रमाणे रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे राम नेवले यांनी केली आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी