शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

१५ टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 19:42 IST

: कापूस खरेदी योजनेंतर्गत कापूस पणन महासंघ व सीसीआयमार्फत नागपूर जिल्ह्यातून १८ लाख ६४ हजार १८९ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. पण नागपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन अंदाजे ३०.७६ लाख क्विंटल झाले आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या घरात १५ टक्के कापूस शिल्लक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कापूस खरेदी योजनेंतर्गत कापूस पणन महासंघ व सीसीआयमार्फत नागपूर जिल्ह्यातून १८ लाख ६४ हजार १८९ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. पण नागपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन अंदाजे ३०.७६ लाख क्विंटल झाले आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या घरात १५ टक्के कापूस शिल्लक आहे. पावसामुळे खरेदी केंद्र बंद झाली आहे. कापसाच्या ग्रेडिंगवर परिणाम झाला आहे. खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडले आहेत. त्यामुळे अजूनही घरात कापूस ठेवलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ८९ हजार ९२४ शेतकऱ्यांकडून सरकारने कापसाची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यातील दहा तालुक्यात कापूस पणन महासंघ व सीसीआयमार्फत जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कापसाची खरेदी करण्यात आली. कापूस पणन महासंघाने जिल्ह्यात ६ लाख ६५ हजार क्विंटल खरेदी केली. उर्वरित खरेदी सीसीआयमार्फत करण्यात आली. पाऊस सुरू झाल्याने सध्या सरकारी खरेदी बंद करण्यात आली आहे. सरकारने यंदा कापसाला ५५५० रुपये हमीभाव दिला होता. पण यावर्षी खरेदी उशिरा सुरू झाली आणि केंद्रही अपुरे सुरू केले होते. त्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांचा कापूस विकल्या गेला नाही. आतातर पाऊस सुरू झाल्याने शिल्लक कापूस सरकार खरेदी करणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सरकारी खरेदी केंद्र बंद झाल्याने व्यापाऱ्यांनीही कापसाचे भाव पाडले आहेत. २९०० रुपयांपासून ४४०० रुपयांपर्यंत व्यापारी कापसाला भाव देत आहेत. शेतकऱ्यांजवळ साठवणुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने मिळेल त्या भावात आता शेतकरी कापसाची विक्री करीत असल्याची परिस्थिती आहे.कापूस न विकल्यामुळे कर्जही मिळत नाहीहिंगणा तालुक्यातील शेतकरी नारायण बुंदे म्हणाले, माझ्याकडे ४ एकर शेती आहे. यंदा ४० क्विंटल कापूस झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २९ एप्रिलला नोंदणी केली. परंतु अजूनही कापूस विकल्या गेला नाही. त्यामुळे बँकेकडून घेतलेले पीक कर्ज अजूनही भरले नाही. बँकेकडे चौकशी केली असता, जुने कर्ज भरा, नंतर नवीन कर्ज मिळेल असे सांगण्यात आले. त्यामुळे शेती करताना आता अडचण निर्माण झाली आहे.लवकरात लवकर खरेदी करावीशिल्लक कापूस खरेदी करण्याची हमी सरकारने घेतली आहे. पण आता पावसाचा परिणाम कापसाच्या ग्रेडिंगवर होणार आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर खरेदी करून, शेतकऱ्यांना हमीभावाप्रमाणे रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे राम नेवले यांनी केली आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी