शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात बँकेची १४.९० लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 19:14 IST

वाहन खरेदी करण्यासाठी बँकेत कर्ज प्रकरण दाखल करून दोघांनी १४ लाख ९० हजारांचे कर्ज घेतले. मात्र, वाहन विकत घेतल्याची बनावट कागदपत्रे सादर करून वाहनच खरेदी केले नाही. कर्जाचे हप्ते थकल्यानंतर ही बनवाबनवी बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यावरून त्यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली.

ठळक मुद्देवाहनासाठी बनावट कागदपत्रांवर कर्ज घेतले पण वाहन खरेदीच केले नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : वाहन खरेदी करण्यासाठी बँकेत कर्ज प्रकरण दाखल करून दोघांनी १४ लाख ९० हजारांचे कर्ज घेतले. मात्र, वाहन विकत घेतल्याची बनावट कागदपत्रे सादर करून वाहनच खरेदी केले नाही. कर्जाचे हप्ते थकल्यानंतर ही बनवाबनवी बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यावरून त्यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली.विश्वास पंजाबराव वानखेडे आणि माधव सुभाष बाबलसरे (बेलसरे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे वय काय, ते कुठे राहतात, काय करतात त्याबाबत पोलिसांकडून माहिती स्पष्ट करण्यात आली नाही.बँक आॅफ इंडियाच्या त्रिमूर्तीनगर शाखेत ७ जून २०१७ ला आरोपी वानखेडे आणि बेलसरे यांनी वाहन विकत घेण्यासाठी कर्ज प्रकरण सादर केले. ग्रेस टोयोटोच्या शोरूम मधून वाहन घ्यायचे आहे, असे दाखवत कोटेशन तसेच अन्य कागदपत्रेही सादर केली. त्यानंतर बँकेच्या मागणीनुसार, बनावट कागदपत्रे, ओळखपत्रे दिली. सर्व कागदपत्रे (बनावट) मिळाल्यानंतर बँकेने त्यांना १४ लाख, ९० हजार रुपयांचे वाहन कर्ज मंजूर केले. ही रक्कम उचलल्यानंतर आरोपींनी सदर वाहन खरेदी न करता या रकमेचा गैरवापर केला. दरम्यान, कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेच्या वसुली अधिकाºयांनी आरोपींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा संपर्कच होत नसल्याने त्यांनी दिलेल्या पत्तावर चौकशी केली. तो पत्ताही बनावट असल्याचे लक्षात आल्यामुळे बँकेतर्फे अनिल प्रेमदास राऊत (वय ५६, रा. गुरुदेव अपार्टमेंट) यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशीनंतर गुरुवारी उपरोक्त आरोपींवर गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.बँक अधिकाऱ्यांनी काय केले?बनावट कागदपत्रे सादर करून वाहनाच्या नावावर कर्ज घेण्याचे आणि बँकेला गंडा घालण्याचे प्रकार यापूर्वीही प्रतापनगर, एमआयडीसी ठाण्यात नोंदले गेले आहेत. लहानसहान रकमेचे कर्ज मागणाराला विविध कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही बँक अधिकारी झुलवितात. विविध प्रकारचे तारण आणि त्याची बारीकसारीक चौकशी केल्यानंतरच कर्जाची रक्कम देतात. या प्रकरणात अधिकारी काय करीत होते, असा प्रश्न आहे. कर्जाची रक्कम देण्यापूर्वी वाहन कंपनीच्या वितरकाकडून आरोपींनी वाहन खरेदी केल्याची खात्री बँक अधिकाऱ्यांनी का करून घेतली नाही, असाही प्रश्न पोलिसांना पडला आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाBank of Indiaबँक ऑफ इंडिया