शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

नागपूर जिल्ह्यात नुकसान भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात १३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:37 IST

राज्यपालांनी राज्याला नुकसानभरपाई मंजूर केली आहे. याच्या पहिल्या हप्त्यापोटी जिल्ह्याला १३ कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्याचे लवकरच शेतकऱ्यांना वितरण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

ठळक मुद्दे१,१९,३५५ शेतकरी बाधित : ४६.८५ कोटीचा मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकंदरीत जिल्ह्यात ५४ हजार २०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये सर्वाधिक ३४ हजार ९६२ हेक्टरवरचे नुकसान हे कापसाचे आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतीचे पंचनामे करून शासनाकडे नुकसानभरपाईसाठी ४६ कोटी ८५ लक्ष रुपयाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानुसार राज्यपालांनी राज्याला नुकसानभरपाई मंजूर केली आहे. याच्या पहिल्या हप्त्यापोटी जिल्ह्याला १३ कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्याचे लवकरच शेतकऱ्यांना वितरण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तब्बल ५४ हजार २०२ हेक्टरवरील कापूस, धान, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले. कृषी, महसूल विभागाने पंचनामे केले. प्रशासकीय पातळीवरील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून ४६ कोटी ८५ लक्ष ४८ हजार रुपये मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. त्यानुसार नुकसानभरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी जिल्ह्याला १३ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी शेतकऱ्यांना वितरित केल्यानंतर पुन्हा राज्य शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे. एकूण ४८ कोटीचा निधी हा तीन टप्प्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.ऑगस्ट-सप्टेंबरच्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई शिल्लक!गत ऑगस्ट व सप्टेंबर या पावसाळ्यांच्या दिवसामध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे जिल्ह्यातील २० हजारावरील शेतकऱ्यांच्या ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्या नुकसानभरपाईचा निधी अद्याप राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला नाही.

केंद्रीय पथक घेणार विदर्भातील नुकसानीचा आढावा

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीतील शेतपिकांचे नुकसान पाहण्यासाठी पाचही विभागामध्ये केंद्रीय पथक  तीन दिवसीय पाहणी दौरा करून आढावा घेणार आहे.यामध्ये नागपूर आणि अमरावती विभागाचा नुकसान पाहणी दौरा कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर. पी. सिंह हे शुक्रवार २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान आढावा घेणार आहेत. हे केंद्रीय पथक विभागातील सर्व जिल्ह्यातील अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागास भेट देणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीnagpurनागपूर