शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नागपूर जिल्ह्यातील ५१७८ पैकी १२२९ उद्योग रेड कॅटेगरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 10:48 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्याच्या परिसरात लहानमोठे ५००० च्यावर उद्योग कार्यरत आहेत. यापैकी प्रदूषण नियंत्रणाचे निकष पूर्ण न करणारे तब्बल १२२९ उद्योग रेड कॅटेगरीत आले आहेत.

ठळक मुद्देऑरेंज कॅटेगरीत २१५९ प्रदूषणविरहित मोठे व मध्यम उद्योग नगण्य

निशांत वानखेडे

नागपूर : राज्याची उपराजधानी व विदर्भातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. मध्य भारतातील महत्त्वाचे शहर म्हणूनही नागपूरची औद्योगिक भरभराट होत आहे. मात्र यासोबत प्रदूषणातही वाढ झाली आहे. अपेक्षेप्रमाणे जिल्ह्याच्या परिसरात लहानमोठे ५००० च्यावर उद्योग कार्यरत आहेत. यापैकी प्रदूषण नियंत्रणाचे निकष पूर्ण न करणारे तब्बल १२२९ उद्योग रेड कॅटेगरीत आले आहेत. त्या खालोखाल स्तर कमी असला तरी प्रदूषणाच्या ऑरेंज कॅटेगरीत असलेल्यांमध्ये तब्बल २१५९ उद्योगांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नागपूर जिल्ह्यात असलेले तीन औष्णिक विद्युत प्रकल्प प्रदूषणाचे सर्वात मोठे घटक आहेत. १९८० मेगावॅट वीज निर्मिती करणारे सर्वात मोठे कोराडी विद्युत निर्मिती केंद्र ५ किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. दसरे खापरखेडा विद्युत केंद्रात १३४० मेगावॅट वीज निर्माण केली जाते व तिसरे ४२० मेगावॅटचे कोराडी थर्मल पॉवर प्लॅन्ट. महत्त्वाचे म्हणजे ही तिन्ही केंद्र कोळशावर आधारीत असल्याने मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या धुळीमुळे वायुप्रदूषणाचे कारण ठरले आहे. शिवाय परिसरात जलप्रदूषणही होत आहे. याशिवाय डब्ल्यूसीएलच्या ५ खुल्या व ३ भूमिगत कोळसा खाणी, मॉईलच्या ३ खुल्या व एक भूमिगत खाण आहेत. कळमेश्वरचे स्टील प्लॅन्ट आहे. याशिवाय सावनेर-कळमेश्वर-काटोल-पारशिवनी परिसरात एमआयडीसी, बुटीबोरी, हिंगणा एमआयडीसी मोठ्या प्रमाणात उद्योग उभारले गेले आहे. यासोबतच मद्यनिर्मिती कारखाने, रासायनिक कंपन्या, स्टील, सिमेंट आदींचे कारखानेही याच प्रमाणात आहेत.

ग्रीन कॅटेगरीत नगण्य उद्योग

प्रदूषणाची पातळी अत्यल्प असलेल्या उद्योगांची संख्या जिल्ह्यात नगण्यच म्हणावी लागेल. बुटीबोरी, एमआयडीसी भागात ग्रीन कॅटेगरीत एकही मोठा उद्योग नाही तर मध्यम उद्योग ३ आहेत. सावनेर, कळमेश्वर, काटोल भागात मोठे ४ व मध्यम ४ उद्योग ग्रीनमध्ये येतात. दोन्ही भागात अनुक्रमे ९८१ व ११७७ लघुउद्योगांचा समावेश आहे.

२३३ पर्यंत गेलेले वायुप्रदूषण, जलप्रदूषणातही वाढ

२०१८-१९ साली हिंगणा एमआयडीसी मॉनिटर स्टेशनवरून सर्वेक्षणानुसार प्रदूषणाचा स्तर सरासरी ‘२३३ मायक्रोग्रॅम/मीटरक्युब’वर गेलेला आहे. ९० ते १०० च्या मर्यादेपर्यंत तो समाधानकारक मानला जातो. यामध्ये ४४८ मायक्रोग्रॅ/मी.क्युब एसपीएम व २८३ मायक्रोग्रॅम/मी.क्युब आरएसपीएमची नोंद करण्यात आली आहे. कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पाजवळ प्रदूषणाने धोक्याची मर्यादा केव्हाच ओलांडली आहे. जलप्रदूषणाची पातळीही वाढली आहे. एमआयडीसी हिंगणा मधील उद्योगातून निघणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे नाग नदी पूर्णपणे प्रदूषित झाली आहे.

पीक धोक्यात, कॅन्सरसारखे आजार

पर्यावरण तज्ज्ञ शरद पालिवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोराडी व खापरखेडा वीज केंद्राच्या आसपास शेकडो एकर परिसरातील पीक संकटात आहे. पिकांची उत्पादकता घटली असून झाडांचाही ऊर्जानिर्मितीवर परिणाम झाला आहेत. मानवी आरोग्यावर भीषण परिणाम होत आहेत. वीज केंद्रातून मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या धुलीकणांमुळे त्वचा कॅन्सर, लंग्ज कॅन्सरसारखे आजार बळावत चालले आहेत. श्वसनाचे आजारही या भागात बळावले आहेत. उद्योगांवर नियंत्रण ठेवता येते पण औष्णिक वीज केंद्रांना अभय दिले जात असल्याची टीका पालिवाल यांनी केली.

कोरोनामुळे बरेचसे कारखाने बंद आहेत किंवा आहेत ते कमी क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे यावर्षी प्रदूषणाची पातळी खाली आली आहे. मात्र ज्या उद्योगांनी प्रदूषण नियंत्रणाच्या अटी व शर्थीचे पालन केले नाही त्यांना नोटीस बजावली आहे. मागील काही वर्षाच्या तुलनेत वातावरणाची गुणवत्ता चांगली होत आहे.

- आनंद काटोले, उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी

कारखाने व उद्योगांवर नियंत्रण ठेवून त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण आटोक्यात आणता येते. मात्र नागरी प्रदूषणाला आळा घालणे कठीण आहे. घरातून निघणारे सांडपाणी, रस्त्यावर वाढलेली वाहनांची संख्या हे प्रदूषणाचे मोठे कारण आहेत. नागपूर शहरात उद्योगांपेक्षा तीच मोठी समस्या आहे. त्यामुळे एकूणच प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांच्या सहभागाची आवश्यकता आहे.

- हेमा देशपांडे, उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी, नागपूर

टॅग्स :businessव्यवसायpollutionप्रदूषण