शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपूरच्या स्क्रॅप व्यावसायिकाला १२.२४ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:43 IST

बॅटरीचे स्क्रॅप विकत घेणाऱ्या कळमन्यातील एका व्यावसायिकाला बंगळुरूमधील तिघांनी १२.२४ लाखांचा गंडा घातला. नागपुरातील ओळखीच्या कमिशन एजंटने या फसवणुकीत मुख्य भूमिका वठविली. या चौघांविरुद्ध कळमना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देबंगळुरूच्या तिघांचे कृत्य : एजंटची मुख्य भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बॅटरीचे स्क्रॅप विकत घेणाऱ्या कळमन्यातील एका व्यावसायिकाला बंगळुरूमधील तिघांनी १२.२४ लाखांचा गंडा घातला. नागपुरातील ओळखीच्या कमिशन एजंटने या फसवणुकीत मुख्य भूमिका वठविली. या चौघांविरुद्ध कळमना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.कमल प्रल्हादराय अग्रवाल (वय ५६, रा. नंदलोक अपार्टमेंट, नंदनवन) यांचे कळमन्यातील भरतनगरात कमल ट्रेडिंग नावाने जुन्या बॅटरीचे (भंगार) दुकान आहे. आरोपी मनोज नेवतिया (रा. रामनगर) या धंद्यात कमिशन एजंट म्हणून काम करतो. अग्रवाल यांच्या तो ओळखीचा आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये मनोज अग्रवाल यांच्या दुकानात आला. बंगळुरूमधील व्यापाऱ्यांकडे १०० टन बॅटरी स्क्रॅप असल्याची माहिती त्याने दिली. आपल्या संपर्कातील हे व्यापारी असून, त्यांचा व्यवहार चांगला असल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे अग्रवाल सप्टेंबर २०१८ मध्ये मनोजसोबत बॅटरीचा सौदा करण्यासाठी बंगळुरूला गेले. तेथे आरोपी हाजी सैयद, हाफिज सैयद आणि रहमानभाई (तिघेही रा. जुने विमानतळ, इस्लामपूर मशिदीजवळ, बंगळुरू) यांनी अग्रवाल यांना स्क्रॅप बॅटरीचे गोदाम दाखविले. मात्र, सध्या २१ टनच बॅटरीचाच माल असून, नंतर थोडे थोडे करून माल पाठवू, असे ते म्हणाले. अग्रवाल यांनी हा सौदा करण्यास नकार दिला. मात्र, आरोपी मनोज नेवतियाने हट्ट धरल्यामुळे अग्रवाल यांनी आरोपी हाजी सैयद तसेच हाफिज सैयदसोबत सौदा केला. नंतर ते नागपुरात परत आले आणि त्यांनी त्यांचा नोकर शेख फारुक शेख मोहम्मद याला सौदा केलेला माल घेण्याकरिता बंगळुरूला पाठविले. १४,०५० किलोग्राम माल ट्रकमध्ये भरल्यानंतर त्याचे फोटो तसेच इनव्हाईस फारुकने अग्रवाल यांना पाठविले. उर्वरित माल नंतर येणार असल्याचे कळवले. त्यानुसार, अग्रवाल यांनी एचडीएफसी तसेच युनियन बँकेतून आरोपींच्या खात्यात १२ लाख २४,५३० रुपये आरटीजीएसने जमा केले तर, त्याचे कमिशन म्हणून २८ हजार रुपये नेवतियाच्या खात्यात जमा केले. १२ ते २२ सप्टेंबर २०१८ ला हा व्यवहार पार पडला.नंतर अग्रवाल मालाचा ट्रक कधी येतो म्हणून वाट बघू लागले. बरेच दिवस होऊनही माल पोहचला नसल्याने त्यांनी आरोपींशी संपर्क साधला. आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ चालवली. आता पाच महिने होऊनही आरोपींकडून अग्रवाल यांना माल मिळालाच नाही. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने अग्रवाल यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी हाजी सैयद, हाफिज सैयद आणि रहमानभाई तसेच नेवतियाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :businessव्यवसायfraudधोकेबाजी