शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

काँग्रेसकडे १२ जागांचा प्रस्ताव; अन्यथा सर्व ४८ जागा लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:30 IST

काँग्रेसकडे १२ लोकसभेच्या जागांचा प्रस्ताव ठेवला आहे, हा प्रस्ताव काँग्रेसने मान्य केला तर काँग्रेसची सत्ता येऊ शकते. अन्यथा आम्ही पूर्ण ४८ जागा लढवणार, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर यांचे सुतोवाच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आमची लढाई ही संविधान वाचवण्याची आहे. काँग्रेस संविधान मानणारी आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आम्ही आजवर ज्या समाजाला प्रतिनिधित्वच मिळालेले नाही, अशा वंचित घटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी काँग्रेसकडे १२ लोकसभेच्या जागांचा प्रस्ताव ठेवला आहे, त्यावर अजून चर्चा सुरू असेल असे आम्ही समजतो. हा प्रस्ताव काँग्रेसने मान्य केला तर काँग्रेसची सत्ता येऊ शकते. अन्यथा आम्ही पूर्ण ४८ जागा लढवणार, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सत्ता संपादन निर्धार मेळावा व संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, धनगर, भटके विमुक्तांसह विविध वंचित समाजाने आता हा निर्णय घेतला आहे की, स्वातंत्र्याच्या ७० वर्षात त्यांना कुठल्याच सरकारकडून काहीही मिळालेले नाही. त्यांचा केवळ वापरच करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता आपणच सत्ता हस्तगत करावी आणि आपले प्रश्न सोडवून घ्यावे. ही वस्तुस्थिती काँग्रेसने लक्षात घेणे गरजेचे आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. काँग्रेस संविधानाला मानते म्हणून त्यांना लोकसभेच्या १२ जागा यामध्ये दोन माळी समाज, दोन लहान ओबीसी, दोन भटके विमुक्त, दोन मुस्लीम, दोन धनगर समाजासाठी मागण्यात आल्या आहेत.परंतु काँग्रेस यांना प्रतिनिधित्व देण्याच्या तयारीत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच एक वक्तव्य केले आहे की, मलाच त्यांच्यासोबत जायचे नाही. शरद पवार यांनी काँग्रेस सोडली तेव्हा सोनिया गांधी यांच्यासोबत मी गेलो नसतो तर देशात सोनिया गांधी यांचे नावही दिसले नसते, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.तत्पूर्वी देशपांडे सभागृहात पार पडलेल्या संवाद मेळाव्याला राजू लोखंडे, माजी आमदार लक्ष्मण माने, अ‍ॅड. विजयराव मोरे, माना समाजाचे रमेश गजबे, धनगर समाजाचे रमेश देवाजी पाटील, हलबा समाजाचे डॉ. सुशील कोहड, प्रा. बी.के. हेडाऊ, अरविंद सांदेकर, सागर डबरसे, लटरू मडावी, अ‍ॅड. संदीप नंदेश्वर, अजय सहारे आदींनी मार्गदर्शन केले.

नोटाबंदीदरम्यान आरएसएसला ३०० कोटीची गुरुदक्षिणानोटाबंदीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भाजपकडून ३०० कोटी रुपयांची गुरुदक्षिणा मिळाली, अशी टीका करीत त्या नोटा आरएसएसने कोणत्या बँकेत ठेवल्या किंवा कशा बदलून घेतल्या, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. तसेच नोटा बदलवणे किंवा रद्द करण्याचा अधिकार पंतप्रधानांना नाही. तो रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला आहे. तेव्हा हा अधिकार पंतप्रधानांना कसा दिला, यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरविरुद्ध फौजदारी याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी मेळाव्यात दिला.

प्रकाश आंबेडकर यांना २०१९ मध्ये मुख्यमंत्री तर २०२४ मध्ये पंतप्रधान बनवणारलक्ष्मण माने यांनी महराष्ट्रातील सर्व वंचित घटकांनी आता २०१९ च्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री आणि २०२४ मध्ये पंतप्रधान करण्याचा संकल्प केला असल्याचे संवाद मेळाव्यात बोलताना जाहीर केले. पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी दिल्ली येथे संविधानाची होळी करणाऱ्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच साध्या गणेश मंडळांनाही पावती फाडण्यासाठी नोंदणी आवश्यक असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी ती का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत आमचे सरकार आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्यानुसार नोंदणी करायला लावू अन्यथा त्यांच्या संघटनेवर बंदी घालू, असे जाहीर केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर