शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

नो टेन्शन; ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या मदतीला गुरुजींची कॉपी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 14:57 IST

होम सेंटर असले तरी ग्रामीण भागात तालुकास्तरावरील परीक्षा केंद्रावर परीक्षा शिस्तीत सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले. मात्र तालुक्यापासून लांब अंतरावरच्या परीक्षा केंद्रांवर गुरुजी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आल्याचे दिसून आले.

कुही/काटोल (नागपूर) : बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचा धोका आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप लक्षात घेत विद्यार्थ्यांना त्यांचेच कॉलेज परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. होम सेंटर असले तरी ग्रामीण भागात तालुकास्तरावरील परीक्षा केंद्रावर परीक्षा शिस्तीत सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले. मात्र तालुक्यापासून लांब अंतरावरच्या परीक्षा केंद्रांवर गुरुजी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आल्याचे दिसून आले. मात्र गुरुजी विद्यार्थ्यांना ही मदत अधिक दक्ष राहून करीत आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याने गेटवर शिपाई शांतता ठेवा, बारावीची परीक्षा सुरू असल्याचे सांगताना दिसून आले.

कुही तालुक्यात ७ परीक्षा केंद्र आहे. बुधवारी वाणिज्य शाखेचा वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा पेपर होता. विद्यार्थी शांततेत व सुरळीत पेपर सोडविताना दिसले. त्यातही गुरुजींकडून विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगणे व कॉपी करू देणे हा प्रकार चुपके चुपके सुरू असल्याचे जाणवत होते. कुही तालुक्यात १८०१ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. बुधवारी वाणिज्य शाखेचा वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (ओ.सी.) या विषयाचा पेपर होता. यात चार केंद्रांवरून ९५ परीक्षार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यापैकी पचखेडी येथील केंद्रावरील एक विद्यार्थी अनुपस्थित होता. एकूण ९४ परीक्षार्थी उपस्थित होते.

कुही येथील ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे ३७ परीक्षार्थी परीक्षा देत होते. दरम्यान कुहीचे तहसीलदार शरद कांबळे यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन केंद्रांची पाहणी केली. यावेळी विद्यार्थी शांततेत पेपर सोडविताना दिसून आले. पचखेडी येथील मुकुंदराज स्वामी कनिष्ठ महाविद्यालय येथे दोन खोल्यांमध्ये ३३ विद्यार्थी परीक्षा देत होते. येथेही कुठलाही अनुचित प्रकार आढळून आलेला नाही.

मांढळ येथील एज्युनेक्स्ट कॉन्व्हेंटमध्ये १९ तर पी.पी. तिजारे कनिष्ठ महाविद्यालय येथे ६ विद्यार्थी परीक्षेला बसलेली होती. विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था शासनाच्या नियमाप्रमाणे झिकझॅक पद्धतीने प्रत्येक परीक्षा केंद्रावर केल्याचे दिसून आले. यावेळी बाहेरील नागरिकांचा कुठलाच त्रास परीक्षा केंद्रावर दिसून आलेला नाही. मात्र शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी कॉपी करीत असल्याचा भास जाणवत होता.

इयत्ता १२ वीचे तीन पेपर झालेले आहेत. यात एकही विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आलेला नाही. परीक्षा केंद्रावर आम्ही स्वतः भेट देऊन पाहणी करतो. परीक्षा सुरळीत व शांततेत सुरू आहेत.

शारदा किनारकर, गटशिक्षणाधिकारी

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थी