शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

१२ ई-रिक्षा जप्त : आरटीओची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 22:50 IST

बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षाला मान्यता मिळून दोन वर्षाचा कालावधी लोटला असलातरी नागपुरात केवळ ५००वर ई-रिक्षांची नोंदणी झालेली नाही. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करताच प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने आपल्या विशेष पथकाच्या मदतीने ई-रिक्षा तपासणी मोहीम हाती घेत १२ ई-रिक्षा जप्त केल्या.

ठळक मुद्देनोंदणी नसणाऱ्यांना साडेचार हजार रुपयांपर्यंतचा दंडलोकमत इम्पॅक्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षाला मान्यता मिळून दोन वर्षाचा कालावधी लोटला असलातरी नागपुरात केवळ ५००वर ई-रिक्षांची नोंदणी झालेली नाही. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करताच प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने आपल्या विशेष पथकाच्या मदतीने ई-रिक्षा तपासणी मोहीम हाती घेत १२ ई-रिक्षा जप्त केल्या. या तपासणी मोहिमेला आणखी गती देण्यात येईल, असेही या कार्यालयाचे म्हणणे आहे.शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी, पेट्रोल-डिझेलचा वापर टाळण्यासाठी आणि शहरवासीयांना स्वस्तात वाहतूक सुविधा मिळवून देण्यासाठी विजेवर चालणाऱ्या ई-रिक्षाला २०१६ मध्ये हिरवी झेंडी मिळाली. त्या पूर्वीही हजारावर ई-रिक्षा उपराजधानीत धावत होत्या. मंजुरी मिळाल्यानंतर यात दुपटीने वाढ झाली. सध्याच्या स्थितीत आठवड्याभरात दोन नव्या ई-रिक्षा रस्त्यावर येत आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. असे असताना, ई-रिक्षाच्या नोंदणीविषयी उदासीनता होती. नुकतचे ई-रिक्षा (प्रवासी वाहन) व ई-कार्ट (मालवाहू वाहन) यांना मोटर वाहन कायदा व नियम लागू करून त्यांची एक महिन्यांत नोंदणी करण्यात यावी असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २४ जानेवारी रोजी राज्य शासनाला दिला. परंतु त्यानंतरही आरटीओ कार्यालयांमध्ये ई-रिक्षांच्या नोंदणीचा आकडा वाढला नव्हता. नागपूर शहर आरटीओ कार्यालयात साधारण ५० तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूर येथे ४५० ई-रिक्षांची नोंदणी झाली. यावरून सध्याच्या घडीला अडीच हजारावर ई-रिक्षा अवैधपणे रस्त्यावर धावत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ३० जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध केले. याची दखल शहर आरटीओ कार्यालयाने घेऊन ई-रिक्षा तपासणी मोहीम हाती घेतली. यातील नोंदणी नसलेल्या १२ ई-रिक्षा जप्त केल्या.चालकांचे धाबे दणाणलेनोंदणी नसलेल्या ई-रिक्षांना थेट जप्त करण्याची मोहीमच आरटीओने हाती घेतल्याने चालकांचे धाबे दणाणले आहेत. संपूर्ण दंड भरून नोंदणी केल्यावरच वाहनांना सोडण्यात येत आहे. ई-रिक्षाची नोंदणी नसल्यास २ हजार रुपये दंड, विमा नसल्यास २ हजार दंड व इतरही दंड मिळून असे साडेचार ते पाच हजारांचा दंड वाहनचालकांवर पडत आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर