शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश : निकालाच्या दीड महिन्यानंतर सुरू हाेणार प्रवेश

By निशांत वानखेडे | Updated: June 24, 2025 20:02 IST

२६ला लागेल काॅलेज अलाॅटमेंटची यादी : २७ पासून पहिल्या फेरीचे प्रवेश

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीअंतर्गत अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया गुरुवार, २६ जूनपासून पुन्हा वेग घेणार आहे. २६ तारखेला विद्यार्थ्यांना अलाॅट झालेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर हाेणार आहे. २७ पासून पहिली फेरी सुरू हाेणार असून, विद्यार्थी प्रत्यक्ष मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश करू शकतील.

अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १९ मेपासून सुरू करण्यात आली हाेती. सराव नाेंदणीनंतर २१ मेपासून प्रत्यक्ष नाेंदणी सुरू हाेणार हाेती. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचे संकेतस्थळ ठप्प पडले आणि प्रक्रिया खाेळंबली. पुढे २६ मेपासून पुन्हा नाेंदणी सुरू करण्यात आली. ३ जूनपर्यंत असलेली मुदत पुढे ५ जून व नंतर ८ जूनपर्यंत वाढविण्यात आली. ११ व १२ जूनला महाविद्यालयीन काेटा प्रवेश घेण्यात आले. १४ जूनपासून सामान्य प्रवेश सुरू हाेणार हाेते. मात्र, शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया तब्बल १०-१२ दिवस पुढे ढकलली. म्हणजे १३ मे राेजी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालाला तब्बल दीड महिना लाेटल्यानंतर आता कुठे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात हाेणार आहे.

२७ जून ते ३ जुलैपर्यंत प्रवेशाची पहिली फेरी चालणार आहे. या काळात विद्यार्थी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश करू शकतील. ज्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही, ते विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी लाॅगीनमध्ये नाेंद करू शकतील. या काळात नवीन विद्यार्थी नाेंदणी करू शकतील आणि भाग १ लाॅक करतील. विद्यालयांनी काेटा प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागा कॅप राउंडमध्ये प्रत्यार्पित करायच्या आहेत. ४ जुलै राेजी रिक्त जागा प्रदर्शित करून दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू हाेईल.

...असे आहे वेळापत्रक

  • सध्या २४ व २५ जून राेजी विद्यार्थ्यांनी काेटा प्रवेशासाठी ऑनलाइन पसंती नाेंदविणे व लाॅक करणे.
  • २६ जून : पाेर्टलवर विद्यार्थ्यांना अलाॅट झालेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर करणे. लाॅगीनमध्ये तपशील दर्शविणे व विद्यार्थ्यांना माेबाइल संदेश पाठविणे.
  • २७ जून ते ३ जुलै : प्रवेशाची पहिली फेरी. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे.
  • ३ जुलै रात्री ८:०० पर्यंत : विद्यालयांना प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पाेर्टलवर अपलाेड करायची आहे.
  • ४ जुलै राेजी रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाईल.

 

नाेंदणी केवळ ४० हजारनागपूर जिल्ह्यात १९८ कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशाच्या ९८ हजार जागा आहेत. त्यासाठी आतापर्यंत केवळ ४० हजाराच्या जवळपास विद्यार्थ्यांची नाेंदणी झाली आहे. पाॅलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेनंतर प्रवेश वाढतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, यंदासुद्धा ५० टक्के जागा रिक्त राहतील, अशी शक्यता आहे.

टॅग्स :nagpurनागपूरAdmissionप्रवेश प्रक्रियाEducationशिक्षण