शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

अकरावी प्रवेश : निकालाच्या दीड महिन्यानंतर सुरू हाेणार प्रवेश

By निशांत वानखेडे | Updated: June 24, 2025 20:02 IST

२६ला लागेल काॅलेज अलाॅटमेंटची यादी : २७ पासून पहिल्या फेरीचे प्रवेश

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीअंतर्गत अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया गुरुवार, २६ जूनपासून पुन्हा वेग घेणार आहे. २६ तारखेला विद्यार्थ्यांना अलाॅट झालेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर हाेणार आहे. २७ पासून पहिली फेरी सुरू हाेणार असून, विद्यार्थी प्रत्यक्ष मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश करू शकतील.

अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १९ मेपासून सुरू करण्यात आली हाेती. सराव नाेंदणीनंतर २१ मेपासून प्रत्यक्ष नाेंदणी सुरू हाेणार हाेती. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचे संकेतस्थळ ठप्प पडले आणि प्रक्रिया खाेळंबली. पुढे २६ मेपासून पुन्हा नाेंदणी सुरू करण्यात आली. ३ जूनपर्यंत असलेली मुदत पुढे ५ जून व नंतर ८ जूनपर्यंत वाढविण्यात आली. ११ व १२ जूनला महाविद्यालयीन काेटा प्रवेश घेण्यात आले. १४ जूनपासून सामान्य प्रवेश सुरू हाेणार हाेते. मात्र, शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया तब्बल १०-१२ दिवस पुढे ढकलली. म्हणजे १३ मे राेजी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालाला तब्बल दीड महिना लाेटल्यानंतर आता कुठे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात हाेणार आहे.

२७ जून ते ३ जुलैपर्यंत प्रवेशाची पहिली फेरी चालणार आहे. या काळात विद्यार्थी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश करू शकतील. ज्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही, ते विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी लाॅगीनमध्ये नाेंद करू शकतील. या काळात नवीन विद्यार्थी नाेंदणी करू शकतील आणि भाग १ लाॅक करतील. विद्यालयांनी काेटा प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागा कॅप राउंडमध्ये प्रत्यार्पित करायच्या आहेत. ४ जुलै राेजी रिक्त जागा प्रदर्शित करून दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू हाेईल.

...असे आहे वेळापत्रक

  • सध्या २४ व २५ जून राेजी विद्यार्थ्यांनी काेटा प्रवेशासाठी ऑनलाइन पसंती नाेंदविणे व लाॅक करणे.
  • २६ जून : पाेर्टलवर विद्यार्थ्यांना अलाॅट झालेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर करणे. लाॅगीनमध्ये तपशील दर्शविणे व विद्यार्थ्यांना माेबाइल संदेश पाठविणे.
  • २७ जून ते ३ जुलै : प्रवेशाची पहिली फेरी. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे.
  • ३ जुलै रात्री ८:०० पर्यंत : विद्यालयांना प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पाेर्टलवर अपलाेड करायची आहे.
  • ४ जुलै राेजी रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाईल.

 

नाेंदणी केवळ ४० हजारनागपूर जिल्ह्यात १९८ कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशाच्या ९८ हजार जागा आहेत. त्यासाठी आतापर्यंत केवळ ४० हजाराच्या जवळपास विद्यार्थ्यांची नाेंदणी झाली आहे. पाॅलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेनंतर प्रवेश वाढतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, यंदासुद्धा ५० टक्के जागा रिक्त राहतील, अशी शक्यता आहे.

टॅग्स :nagpurनागपूरAdmissionप्रवेश प्रक्रियाEducationशिक्षण