शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जन्मजात व्यंग घेऊन जन्माला आली ११७ बालके; ‘डाउन सिंड्रोम’ची सर्वाधिक बालके नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 07:00 IST

Nagpur News कोरोनाचा दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत पूर्व विदर्भात या आजाराची ११७ बालके जन्माला आली. तज्ज्ञाच्या मते, हा प्रतिबंध करणारा आजार असतानाही जनजागृती व सोयींअभावी या आजाराची बालके जन्माला येणे गंभीर आहे.

ठळक मुद्दे नोंद न झालेल्या बालकांची संख्या अधिक

सुमेध वाघमारे

नागपूर : ‘डाउन सिंड्रोम’ हा जन्मजात किंवा गर्भधारणेच्या काळापासून बालकांमध्ये होणारा आजार. मुले जन्मत:च शारीरिक व्यंग घेऊन जन्माला येतात. कोरोनाचा दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत पूर्व विदर्भात या आजाराची ११७ बालके जन्माला आली. तज्ज्ञाच्या मते, हा प्रतिबंध करणारा आजार असतानाही जनजागृती व सोयींअभावी या आजाराची बालके जन्माला येणे गंभीर आहे.

डाउन सिंड्रोम असलेल्यांमध्ये बौद्धिक आणि जन्मजात व्यंग दिसून येतात. बौद्धिक पातळीत काहींमध्ये कमी तर काहींमध्ये जास्त व्यंग असतात. याशिवाय हृदयविकाराची समस्या, पाचनक्रियेशी संंबंधित तक्रारी, काहींमध्ये ऐकण्यात आणि पाहण्यात कमतरता, रक्ताच्या कर्करोगाचा धोका तसेच थायरॉड ग्रंथीच्या समस्याही असतात. भारतात जन्माला येणाऱ्या ८०० मुलांमध्ये या आजाराचे एक मूल जन्माला येते. फिजिओथेरपी व डेव्हलपमेंट थेरपीने या आजाराने पीडित मुले चांगले आयुष्य जगू शकतात. परंतु आजाराचे वेळीच निदान होत नसल्याने आजाराची गुंतागुंत वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- नागपुरात ३३ तर, गडचिरोलीत ६ रुग्ण

उपसंचालक आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत १ एप्रिल २०२१ ते २० मार्च २०२२ या दरम्यान ‘डाउन सिंड्रोम’ची ११७ बालके जन्माला आली. यात एकट्या नागपूर जिल्ह्यात ३३ बालकांची नोंद झाली. त्याखालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात २६, भंडारा जिल्ह्यात २१, वर्धा जिल्ह्यात १७, गोंदिया जिल्ह्यात १४ तर गडचिरोली जिल्ह्यात ६ बालके जन्माला आली आहेत. परंतु हा आकडा फारच कमी असल्याचे तज्ज्ञ म्हणतात.

- महाराष्ट्रात दरवर्षी २५०० वर बालकांचा जन्म

डाउन सिंड्रोम केअर असोसिएशन, इंडियाचे अध्यक्ष आणि नाशिकच्या जेनेटिक हेल्थ अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. ज्ञानदेव चोपडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “जनजागृती व सोयींअभावी महाराष्ट्रात दरवर्षी ‘डाउन सिंड्रोम’ची सुमारे २५०० वर बालके जन्माला येतात. हा प्रतिबंध करणारा आजार असतानाही ही संख्या धक्कादायक आहे. या आजाराबाबत सामान्य नागरिकच नव्हे, तर अनेक डॉक्टरांनाही याची विशेष माहिती नाही. यामुळे प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत प्रशिक्षित करणे, लक्षणे असलेल्या बाळाचे निदान करण्याची सोय उभी करणे व त्याला चांगले आयुष्य जगता यावे यासाठी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.

- ३५ वर्षांवरील गर्भवती मातांची तपासणी आवश्यक

ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी म्हणाले, ३५ व त्यावरील वय असलेल्या प्रत्येक गर्भवती मातेची योग्य पद्धतीने व स्वस्त दरात तपासणी होणे आवश्यक आहे. असे केल्यास या आजराला रोखणे शक्य आहे.

 

 

टॅग्स :Healthआरोग्य