शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

नागपुरात तीन महिन्यात बलात्कार आणि विनयभंगाच्या ११४ घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 10:10 IST

घरातील चार भिंती असू द्या किंवा शाळेतील अंगण, मुली कुठेच सुरक्षित नाहीत. त्यांना प्रत्येक ठिकाणी लक्ष्य केले जात आहे. लहानमोठे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. दर दिवशी असे प्रकार समोर येत असून या घटना मानवतेला काळिमा फासणाऱ्या ठरत आहेत.

ठळक मुद्देघर, शाळा, अंगण किंवा रस्ता असो, मुली सुरक्षित नाहीतवडिलांनीच केला १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

जगदीश जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरातील चार भिंती असू द्या किंवा शाळेतील अंगण, मुली कुठेच सुरक्षित नाहीत. त्यांना प्रत्येक ठिकाणी लक्ष्य केले जात आहे. लहानमोठे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. दर दिवशी असे प्रकार समोर येत असून या घटना मानवतेला काळिमा फासणाऱ्या ठरत आहेत. मागील तीन महिन्यात दाखल झालेल्या प्रकरणांचाच विचार केला तर ही धक्कादायक बाब उघडकीस येते. गेल्या तीन महिन्यात (जानेवारी ते मार्च ) दरम्यान बलात्कार आणि विनयभंगाच्या ११४ घटना घडल्या. यात बलात्काराच्या २८ व विनयभंगाच्या ८६ घटनांचा समावेश आहे. दोन्ही प्रकरणात अल्पवयीन मुलींचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. वडीलच करायचे अत्याचारगिट्टीखदान पोलीस ठाणे परिसरात एका १३ वर्षाच्या मुलीवर तिचे वडील घरातच पाशवी अत्याचार करीत होते. तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. तिच्या मैत्रिणी आणि शिक्षकांच्या जागरुकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईने आरोपी पतीला पोलिसांच्या स्वाधीन केले.

चौकात फिरत असतात गुन्हेगारसीताबर्डीतील वर्दळीचा परिसर असलेल्या झाशी राणी चौकात बालाघाट येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून गुन्हेगारांनी तिचा गँगरेप केला होता. १६ मार्च रोजी तरुणी हिंगणा येथील आपल्या भावाला भेटण्यासाठी बालाघाट येथून आली होती. हिंगण्याच्या बसमध्ये बसण्यासाठी ती झाशी राणी चौकात उभी होती. दरम्यान हुडकेश्वर परिसरातील गुंड मो. शोएब मो. साबीर आणि मो. इब्राहीम अन्सारी यांची तिच्यावर नजर गेली. तिच्या भावाला आपण ओळखत असल्याचे सांगून तिला कामठी रोडवरील उप्पलवाडीत घेऊन गेले आणि तिचावर पाशवी अत्यचार केला. यानंतर तिला रेल्वे ट्रॅकवर फेकून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडित मुलगी आपला जीव वाचवून नग्न अवस्थेतच पळाली. शेजाऱ्यांची तिच्यावर नजर गेल्याने तिचा जीव वाचला.

शाळाही नाही सुरक्षितमानेवाडा येथील १६ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीचा शाळेतच विनयभंग करण्यात आला होता. २३ फेब्रुवारी रोजी शाळेचा शेवटचा दिवस होता. बोर्ड परीक्षेचे प्रवेश पत्र घेण्यासाठी ती शाळेत आली होती. सकाळी ११ वाजता शाळेच्या पायऱ्या चढत असताना एका ३० ते ३२ वर्षाच्या युवकाने तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड केल्याने तो पळून गेला. आरोपी शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. परंतु दोन महिने होऊनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

त्या मुलीला बसला मानसिक धक्कातीन वर्षापर्यंत घरामध्येच वडिलांचा अत्याचार सहन करीत असलेल्या मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. आता एखादा पुरुष जवळ येताच ती हिंसक होते. शाळेतही मित्रमैत्रिणी जवळ आल्यावर तिला राग येतो. शहरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञाकडे तिचा उपचार सुरू आहे.त्रस्त होऊन तरुणीने केली आत्महत्या१७ वर्षाच्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून २३ वर्षीय कैलाश धकाते याने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एका मंदिरात लग्न करून तो तरुणीसोबत राहू लागला. लग्नाच्या आठवडाभरातच त्याने तिला अमानवीय त्रास देऊन तिच्या आईवडिलांकडे सोडून दिले. तरुणीने त्रासाला कंटाळून १८ जानेवारी रोजी गळफास घेतला.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा