शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात रेल्वेचे ११ अपघात टळले; सतर्क कर्मचाऱ्यांचा सत्कार

By नरेश डोंगरे | Updated: February 11, 2025 19:07 IST

Nagpur : तर मालगाडी घसरली असती

नरेश डोंगरे - नागपूर                                                                                                                                      

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : यावर्षीच्या पहिल्याच महिन्यात अर्थात जानेवारी २०२५ मध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी रेल्वेचे तब्बल ११ अपघात टळले. ऑन रूट सतर्कतेने कर्तव्य बजावणाऱ्या ठिकठिकाणच्या कर्मचाऱ्यांमुळे रेल्वेचे हे संभाव्य अपघात टाळण्यास मदत मिळाली. टळलेल्या या अपघातात नागपूर नजीकच्या बोरखेडीजवळच्याही एका प्रकाराचा समावेश आहे. 

देशात अलिकडे रेल्वे अपघात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे अधिकारी कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहे. छोट्याशा चुकीमुळे किंवा दुर्लक्षितपणामुळे रेल्वे अपघात होतो. त्यामुळे प्रत्येकाने रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम करण्याच्या सूचना वजा आदेश देण्यात आले आहे. सतर्कपणे काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रात वेळोवेळी विशेष पुरस्कार देऊन सन्मानितही केले जाते. आज अशाच कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सतर्क कर्मचाऱ्यांचा सत्कार

महाराष्ट्रात मध्य रेल्वेचे मुंबई पुणे, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ असे चार विभाग (डिव्हीजन) आहेत. जानेवारी महिन्यात मुंबई विभागात रेल्वेचे तीन संभाव्य अपघात टळले. पुणे विभागात चार, सोलापूर २ आणि नागपूर तसेच भुसावळ विभागात प्रत्येकी १ रेल्वेचा अपघात टळला. हे अपघात टाळणाऱ्या ११ ही सतर्क रेल्वे कर्मचाऱ्यांना ११ फेब्रुवारीला मुंबई रेल्वे महाव्यवस्थापक धर्मवीर मिना यांच्या हस्ते 'महाव्यवस्थापक सुरक्षा' हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

... तर मालगाडी घसरली असती१९ जानेवारीला नागपूर नजिकच्या बोरखेडी रेल्वे स्थानकावर अविनाश कुमार नामक पॉईंटसमन कर्तव्यावर होते. एक मालगाडी धावत असताना त्यांना गाडीच्या चवथ्या क्रमांकाच्या वॅगनच्या फ्रंट ट्रॉलीचा व्हील प्लॉज पुर्णत: वर आल्याचे दिसले. तशा अवस्थेत आणखी काही वेळ मालगाडी धावली असती तर ती रुळावरून घसरून मोठा अपघात झाला असता. ते ध्यानात येताच अविनाश कुमार यांनी लगेच ट्रेन मॅनेजर आणि स्टेशन मास्टरला माहिती दिली. त्यामुळे मालगाडी तात्काळ थांबवून दुरूस्ती करण्यात आली. अविनाश कुमार यांच्या सतर्कतेमुळे हा संभाव्य अपघात टळल्याने त्यांना महाव्यवस्थापक मिना यांच्या हस्ते आज मंगळवारी मुंबईत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

टॅग्स :nagpurनागपूर