शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

निकालाच्या चिंतेने दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2023 21:07 IST

Nagpur News दहावीची परीक्षा दिल्यानंतर निकाल कसा लागेल, या चिंतेतून एका १५ वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुळजाईनगर, गारगोटी परिसरात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

नागपूर : दहावीची परीक्षा दिल्यानंतर निकाल कसा लागेल, या चिंतेतून एका १५ वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुळजाईनगर, गारगोटी परिसरात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. मुलीच्या आत्महत्येमुळे तिच्या आईवडिलांवर शोककळा पसरली आहे.

एकता सागर जिभकाटे (वय १५, रा. प्लॉट नं. १४ ए, तुळजाईनगर, गारगोटी परिसर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. एकताच्या कुटुंबात आईवडिल आणि लहान भाऊ आहे. तिचे आई-वडिल मजुरी करतात. तर लहान भाऊ नववीला शिकतो. एकताने दहावीची परीक्षा दिली होती. परंतु मागील पाच-सहा दिवसांपासून तिला सारखी निकाल काय लागतो, याची चिंता वाटत होती. या चिंतेतून तिने शनिवारी २० मे रोजी सकाळी ११ वाजता घरी कोणीच नसताना घराची आतुन कडी लाऊन सिलींग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी सागर बाबुराव जिभकाटे (वय ४२) यांनी दिलेल्या सुचनेवरून हुडकेश्वरचे पोलिस उपनिरीक्षक माधव गुंडेकर यांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे. आत्महत्येपूर्वी एकताने कुठलीही सुसाईड नोट लिहिली नाही. तिच्या या पावलामुळे तिच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला आहे.

टॅग्स :Deathमृत्यू