शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

निकालाच्या चिंतेने दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2023 21:07 IST

Nagpur News दहावीची परीक्षा दिल्यानंतर निकाल कसा लागेल, या चिंतेतून एका १५ वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुळजाईनगर, गारगोटी परिसरात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

नागपूर : दहावीची परीक्षा दिल्यानंतर निकाल कसा लागेल, या चिंतेतून एका १५ वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुळजाईनगर, गारगोटी परिसरात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. मुलीच्या आत्महत्येमुळे तिच्या आईवडिलांवर शोककळा पसरली आहे.

एकता सागर जिभकाटे (वय १५, रा. प्लॉट नं. १४ ए, तुळजाईनगर, गारगोटी परिसर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. एकताच्या कुटुंबात आईवडिल आणि लहान भाऊ आहे. तिचे आई-वडिल मजुरी करतात. तर लहान भाऊ नववीला शिकतो. एकताने दहावीची परीक्षा दिली होती. परंतु मागील पाच-सहा दिवसांपासून तिला सारखी निकाल काय लागतो, याची चिंता वाटत होती. या चिंतेतून तिने शनिवारी २० मे रोजी सकाळी ११ वाजता घरी कोणीच नसताना घराची आतुन कडी लाऊन सिलींग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी सागर बाबुराव जिभकाटे (वय ४२) यांनी दिलेल्या सुचनेवरून हुडकेश्वरचे पोलिस उपनिरीक्षक माधव गुंडेकर यांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे. आत्महत्येपूर्वी एकताने कुठलीही सुसाईड नोट लिहिली नाही. तिच्या या पावलामुळे तिच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला आहे.

टॅग्स :Deathमृत्यू