शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

विदर्भ पर्यटनासाठी १०६ कोटी मंजूर; मिळाले २१.२५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:35 IST

विदर्भातील पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी येथील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला मागील दोन वर्षात १०६.३६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील २१.२१ लाखांचाच निधी प्राप्त झाल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

ठळक मुद्देकसा होणार पर्यटन विकास: विधान परिषदेत प्रकाश गजभिये यांचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी येथील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला मागील दोन वर्षात १०६.३६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील २१.२१ लाखांचाच निधी प्राप्त झाल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. सदस्य प्रकाश गजभिये यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पूर्व व पश्चिम विदर्भ यानुसार कार्यक्षेत्र आहे. नागपूर प्रादेशिक विभाग व अमरावती प्रादेशिक विभाग अशी कार्यक्षेत्र आहेत. मागील दोन वर्षात पूर्व विभागातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या जिल्ह्यासाठी शासनाने ६३.९६ कोटींचा निधी मंजूर केला होता. प्रत्यक्षात १५.९५ कोटींचा निधी प्राप्त झाला. अमरावती विभागातील जिल्ह्यासाठी ४२.४० कोटींचा निधी मंजूर आहे. प्रत्यक्षात ५.३० कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती रावल यांनी लेखी उत्तरात दिली.मंजूर असल्याप्रमाणे निधी उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत विदर्भाचा पर्यटन विकास कसा होईल, असा प्रश्न गजभिये यांनी उपस्थित केला आहे.सिंचन प्रकल्पासाठी ७४९२ कोटींची तरतूदराज्यात सद्यस्थितीत ६४ मोठे , ७९ मध्यम व १९१ लघु असे एकूण ३३४ सिंचन प्रकल्प बांधकामाधीन असून या प्रकल्पांसाठी सन २०१८-१९ या वर्षासाठी ७४९२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत राज्यातील २६ प्रकल्प समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त होतो. तसेच नाबार्डकडूनही या प्रकल्पांना अर्थसाहाय्य प्राप्त करून घेण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त प्रकल्पांसाठी विशेष पॅकेजला केंद्राची मान्यता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महाजन यांनी लेखी उत्तरात दिली. अमरिशभाई पटेल यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८tourismपर्यटन