शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

१०४ योजनेलाच ‘रक्ता’ची गरज; रोज फक्त दोन ते तीन पिशव्यांचाच पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 11:34 IST

तातडीने रक्त हवंय...तर ‘१०४ या टोल फ्री’ क्रमांकावर फोन करा, अन वाजवी दरात रक्त मिळवा...अशा घोषणा करीत २०१४ मध्ये महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली. परंतु पाच वर्षांचा कालावधी होऊनही दिवसाकाठी दोन किंवा तीन रक्त पिशव्यांसमोर ही योजना गेली नाही.

ठळक मुद्देअद्ययावत उपकरणाचा अभाव, रक्ताचा तुटवडा

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तातडीने रक्त हवंय...तर ‘१०४ या टोल फ्री’ क्रमांकावर फोन करा, अन वाजवी दरात रक्त मिळवा...अशा घोषणा करीत २०१४ मध्ये महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली. परंतु पाच वर्षांचा कालावधी होऊनही दिवसाकाठी दोन किंवा तीन रक्त पिशव्यांसमोर ही योजना गेली नाही. विशेष म्हणजे, शहरात रोज साधारण एक हजार रक्तपिशव्यांची मागणी असताना, २०१७ या वर्षात ५३९, २०१८ मध्ये ४५८ तर २०१९ मार्चपर्यंत केवळ १२८ रक्त पिशव्यांचा पुरवठा झाला आहे. रक्ताचा तुटवडा व अद्ययावत उपकरणांच्या अभावामुळे या योजनेलाच ‘रक्ता’ची गरज असल्याचे चित्र आहे.महराष्ट्र राज्य संक्रमण परिषदेतर्फे जीवन अमृत योजना ‘१०४-ब्लड आॅन कॉल’ राज्यात ७ जानेवारी २०१४ सुरू करण्यात आली. गरजू रुग्णास दर्जेदार, सुरक्षित रक्त वाजवी दरात तातडीने उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. गरजू व्यक्तीने या क्रमांकावर दूरध्वनी केल्यावर पुण्यातील केंद्रावर फोन जातो, तेथून संबंधित व्यक्तीच्या ठिकाणावरील १०४ क्रमांकाशी तो जोडला जातो, किंवा संबंधिताच्या मोबाईलवर फोन येतो. यात ४० किमी किंवा एक तासाच्या अंतरावरील रुग्णालयांना शीतसाखळीतून रक्त उपलब्ध करून दिले जाते. परंतु या क्रमांकाची जनजागृती होऊनही या क्रमाकांकडून रक्ताची फार कमी मागणी होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे या योजनेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे झाल्याचे बोलले जात आहे.

प्लाज्मा, प्लेटलेटचा अभावडागा रुग्णालयाच्या रक्तपेढीतून सुरू असलेल्या या योजनेकडे शासनाचे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष झाले. योजना सुरू होऊन पाच वर्षे झाले असताना रक्तपेढीसाठी आवश्यक असलेले ‘कम्पोनंट सेप्रेटर’ सारखे आवश्यक उपकरण उपलब्ध झाले नाही. यामुळे रुग्णांना केवळ होल ब्लड (संपूर्ण रक्त) दिले जाते. रुग्णांना गरज असलेली प्लाज्मा, प्लेटलेट मिळत नाही. यामुळे योजनेला नव्या संजीवनीची गरज आहे.

रक्ताचा तुटवडाहीसुरुवातीला म्हणजे २०१६ मध्ये ‘१०४-ब्लड आॅन कॉल’ योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु पुढे या योजनेतून गरजू व्यक्तींना हवे त्या वेळी व हव्या त्या रक्त गटाचा पुरवठ्याला केंद्राकडून प्रतिसाद मिळणे कमी झाले. यातच या रक्तपेढीला डागा रुग्णालयातील रुग्णांना व कामठी रुग्णालयातील ‘ब्लड स्टोरेज’ला रक्त पुरवठा करावा लागतो. यामुळे ‘ब्लड आॅन कॉल’साठी फार कमी रक्त पिशव्या उपलब्ध राहत असल्याने याचा फटकाही योजनेला बसत आहे.स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणारे कमी४‘१०४’ योजनेत स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणाऱ्या दात्यांची संख्या अत्यल्प आहे. शिवाय, मनुष्यबळ नसल्याने बाहेर रक्तदान शिबिर घेणे या रक्तपेढीला अडचणीचे जाते. यामुळे या क्रमांकावर फोन केल्यावर रक्त मिळत नाही, अशी लोकांची ओरड आहे.

रक्त पिशव्यांच्या मागणीत घटउपराजधानीत रोज हजार रक्त पिशव्यांची गरज पडते. त्यानुसार ‘१०४- ब्लड आॅन कॉल’ला चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. परंतु सोर्इंच्या अभावी ही योजना बारगळत असल्याचे चित्र आहे. २०१४ मध्ये ३१३, २०१५ मध्ये ५०५, २०१६ मध्ये ७०९, २०१७ मध्ये ५३९, २०१८ मध्ये ४५८ तर २०१९ मार्चपर्यंत केवळ १२८ रक्त पिशव्यांचा गरजू रुग्णांना पुरवठा झाला आहे.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी