शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

नागपुरात १० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 8:02 PM

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यात तब्बल १०,२६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ही प्राथमिक माहिती असून पंचनामे अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे पंचनामे सुरुच, गहू, हरबराचे सर्वाधिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यात तब्बल १०,२६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ही प्राथमिक माहिती असून पंचनामे अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.चार दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. विदर्भासह नागपूर जिल्हाही यातून सुटला नाही. गारपिटीमुळे काटोल, नरखेड, रामटेक, मौदासह जिल्ह्यातील अनेक गावांना फटका बसला. जवळपास १०,२६० हेक्टरवरील गहू, हरभरा आदि पिकांसह संत्रा,मोसंबी, केळी, आंबा ,आदि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास २७६ गावांमधील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यात ११ तारखेला झालेल्या अवकाळी पावसात केवळ मौदा आणि नागपूर ग्रामीण भागालाच फटका बसला होता. तेव्हा जवळपास २०९५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. परंतु १२ तारखेला पुन्हा गारपीट झाली. तेव्हा नरखेड, काटोल, रामटेक आदी भागाला चांगलाच फटका बसला जवळपास ८२०० हेक्टरवरील पिकांना नुकसान झाले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. तेव्हा २४ तासात पंचनामे सादर करून प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कृषी व महसूल विभागाचे अधिकारी बुधवारी सकाळपासूनच फिरत आहेत. पंचनामे करीत आहेत. सायंकाळपर्यंत झालेल्या पाहणीनुसार १० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती होती. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर