शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

नागपुरातून निघणाऱ्या घनकचऱ्यात १० ते १२ टक्के प्लास्टीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 20:32 IST

प्रदूषण हा विषय आता ग्लोबल झाला आहे. जगात ज्या-ज्या घटकापासून प्रदूषण होतेय त्यामध्ये प्लास्टीक सर्वात अग्रेसर आहे. कारण प्लास्टीक हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहे. प्लास्टीकचाच सर्वात मोठा धोका पर्यावरणाला बसतोय. भारतात पर्यावरण आणि स्वच्छतेच्या बाबतीत होत असलेल्या भरपूर प्रयत्नामुळे यावर्षी युनायटेड नेशनने प्लास्टीकपासून होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी भारताला प्रतिनिधित्व दिले आहे. नागपूरचा विचार केल्यास शहरातून निघणाऱ्या घनकचऱ्यातून १० ते १२ टक्के प्लास्टीकचा समावेश असतो.

ठळक मुद्देपर्यावरणाला प्लास्टीकचा धोकाजगभरात प्लास्टीकच्या प्रदूषणाची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदूषण हा विषय आता ग्लोबल झाला आहे. जगात ज्या-ज्या घटकापासून प्रदूषण होतेय त्यामध्ये प्लास्टीक सर्वात अग्रेसर आहे. कारण प्लास्टीक हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग झाले आहे. प्लास्टीकचाच सर्वात मोठा धोका पर्यावरणाला बसतोय. भारतात पर्यावरण आणि स्वच्छतेच्या बाबतीत होत असलेल्या भरपूर प्रयत्नामुळे यावर्षी युनायटेड नेशनने प्लास्टीकपासून होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी भारताला प्रतिनिधित्व दिले आहे. नागपूरचा विचार केल्यास शहरातून निघणाऱ्या घनकचऱ्यातून १० ते १२ टक्के प्लास्टीकचा समावेश असतो.युनायटेड नेशनतर्फे १९७४ पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. दरवर्षी पर्यावरण दिनावर एक थीम ठेवल्या जाते. यावर्षी युनायटेड नेशनने ‘बीट द प्लास्टीक वेस्ट’ ही थीम ठरविली आहे. केंद्र सरकारने २०१६ मध्ये कमी जाडीच्या प्लास्टीक बॅग विक्रीवर बंदी आणली होती. सोबतच भारतात पर्यावरणाच्या बाबतीत होत असलेले काम, स्वच्छतेसाठी देशभरात राबविण्यात आलेले अभियान यामुळे भारताला या थीमवर काम करण्यासाठी प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. प्लास्टीकचे विघटन सहज होत नाही. पृथ्वीवर प्लास्टीकचे अस्तित्व बराच काळ टिकते. घनकचºयात प्लास्टीकचे अस्तित्व १० ते १२ टक्के असते. प्लास्टीक जळाल्यानंतर त्यातून मर्क्युरी, डायआॅक्साइन, फ्युरनसारखे घातक पदार्थ उत्सर्जित होतात. या घातक पदार्थापासून कर्करोगाचा धोका निर्माण होतो. भारतात तर प्लास्टीकच्या पन्नीमुळे महापुराची स्थिती निर्माण झाली होती. पाळीव जनावरांच्या मृत्यूमागे प्लास्टीक हे मोठे कारण पुढे आले आहे. समुद्र आणि तलावाच्या इकोसिस्टमला प्लास्टीकचा धोका निर्माण झाला आहे. प्लास्टीकच्या प्रदूषणाची ही भयावह स्थिती लक्षात घेता, प्लास्टीकच्या वापरावर नियंत्रण मिळविणे गरजेचे झाले आहे.जगभरात प्लास्टीकचे वास्तव५०० बिलियन प्लास्टीक बॅगचा दरवर्षी उपयोग होतो.१३ मिलियन प्लास्टीक दरवर्षी समुद्रात जाते.१७ मिलियन बॅरल आॅईल प्लास्टीक बनविण्यास वापरले जाते.१ लाख समुद्री जीव प्लास्टीकमुळे मरतात.महाराष्ट्र सरकारच्या प्लास्टीक बंदीवर आक्षेपमहाराष्ट्र सरकारने २३ मार्च २०१८ रोजी प्लास्टीकवर बॅन आणले आहे. प्लास्टीकच्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत. लाखो लोक त्यात काम करीत आहे. त्यामुळे प्लास्टीक बंदी महाराष्ट्र सरकारसाठी शक्य नाही. युनायटेड नेशनच्या मते सिंगल टाईम उपयोगात येणाऱ्या प्लास्टीकवर नियंत्रण आणल्यास ५० टक्के प्लास्टीक प्रदूषण कमी होऊ शकते.नागपुरातही प्लास्टीकचा धोकानागपूरचा विचार केल्यास शहरातून निघणाऱ्या घनकचऱ्यातून १० ते १२ टक्के प्लास्टीकचा समावेश असतो. हा कचरा जशास तसा डम्पिंग यार्डमध्ये जमा होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने भांडेवाडीत लाखो मेट्रिक टन कचरा आजही पडला आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून भांडेवाडीत आग लागण्यासारखे प्रकार नेहमीच घडताना दिसताहेत. तरच मिळू शकते प्लास्टीकवर नियंत्रणएकदा वापरून फेकणाऱ्या प्लास्टीकवर नियंत्रण आणल्यास ५० टक्के प्रदूषण कमी होऊ शकते. प्लास्टीक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी वस्तूच्या लाईफ सायकलची गॅरंटी घेऊन, वस्तू खराब झाल्यानंतर परत घेऊन त्याचा उपयोग झाला पाहिजे. घनकचरा संकलनाचे व्यवस्थापन सुधारावे लागेल. सरकारला प्लास्टीकचा पर्याय शोधावा लागेल.कौस्तुभ चॅटर्जी, समन्वयक, ग्रीन व्हिजिल संस्था

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीpollutionप्रदूषण