शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १२ कोटीचा सिंचन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:47 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान दिले जाते. यावर्षी १२ कोटी रुपये या कार्यक्रमासाठी कृषी विभागाला मिळाले आहेत.

ठळक मुद्देअनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना मिळणार लाभयोजनेचा निधीही केला दुप्पट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन गेल्या वर्षीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्र ांती योजनेची अंमलबजावणी करीत आहे. गेल्यावर्षी मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता यावर्षी जिल्ह्यासाठी दोन्ही योजनेचे टार्गेट दुप्पट केले आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान दिले जाते. यावर्षी १२ कोटी रुपये या कार्यक्रमासाठी कृषी विभागाला मिळाले आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षात पात्र लाभार्थ्यांना नवीन सिंचन विहीर तसेच सिंचन साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. १.५० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनु.जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना नवीन विहीर, सोलर मोटार पंप, ठिबक व तुषार आदीसाठी अनुदान दिले जाते. २०१८-१९ या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेसाठी ५.४० कोटी रुपये तर बिरसा मुंडासाठी १.८३ कोटी रुपये अनुदान देण्यात आले होते. यातून अनुसूचित जातीच्या ३०२ शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला तर अनुसूचित जमातीच्या ९१ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला.गेल्या वर्षी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केले होते. त्यामुळे लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होत्या. त्यामुळे योजनेसाठी निधी वाढवून द्यावा, अशी मागणी जि.प. सदस्यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे यावर्षी दोन्ही योजनेच्या निधीत दुपटीने वाढ केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी योजनेसाठी ९ कोटी तर बिरसा मुंडा कृषी योजनेसाठी ३.२५ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले. ५ ऑगस्टपासून शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांनी केले.

५०० फुटाची अट शिथिल करावीगेल्या वर्षी विहिरींच्या लाभार्थ्यांना ५०० फुटाच्या अटीमुळे लाभ मिळू शकला नव्हता. लाभार्थी शेतकऱ्याच्या विहिरीपासून ५०० फुटाच्या अंतरावर कुठलीही विहीर नसावी, विहीर असेल तर जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया त्यास मंजुरी देत नाही. त्यामुळे ही अट शिथिल करावी, अशी मागणी जि.प. माजी सदस्य विनोद पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प